Nitin Gadkari : मूल्यांचे पालन केल्याने विश्वासार्हतेत वाढ; नितीन गडकरी यांनी व्यक्त केले मत
जीवनाच्या सर्व क्षेत्रांत नैतिकता आणि मूल्यांचे पालन करणे महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे व्यक्तीची विश्वासार्हता वाढते, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी रविवारी उद्योजकांच्या मेळाव्याला संबोधित करताना केले.

Nitin Gadkari : जीवनाच्या सर्व क्षेत्रांत नैतिकता आणि मूल्यांचे पालन करणे महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे व्यक्तीची विश्वासार्हता वाढते, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी रविवारी उद्योजकांच्या मेळाव्याला संबोधित करताना केले. ते द इकॉनॉमिक टाइम्स – चेंजमेकर्स ऑफ नागपूर – २०२६ या कार्यक्रमात बोलत होते.
त्यांनी संशोधन आणि विकास तसेच जगभरातील यशस्वी कार्यपद्धतींचा अभ्यास करण्याच्या महत्त्वावरही भर दिला. सकारात्मक दृष्टिकोन आणि चांगल्या व्यावसायिक पद्धतींच्या जोरावर आव्हानांवर मात करता येते, असे गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.
सामाजिक जीवन असो, वैयक्तिक जीवन असो किंवा राजकीय, जीवन मूल्ये अत्यंत महत्त्वाची आहेत. मूल्यांचे जतन केल्याने व्यक्तीची विश्वासार्हता आणि नेतृत्व क्षमता वाढते.
सकारात्मक विचारांचे महत्त्व सांगताना त्यांनी एका अशा व्यावसायिकाचे उदाहरण दिले ज्याने संपूर्ण कारखाना जळून खाक झाल्यानंतरही धिर सोडला नाही आणि जो आता ९० हून अधिक देशांमध्ये आपल्या उत्पादनांची निर्यात करत आहे. पराभूत झाल्यामुळे माणूस संपत नाही, तर प्रयत्न सोडून दिल्याने तो संपतो, असेही गडकरी (Nitin Gadkari) यांनी म्हटले.






