नवी दिल्ली -विज्ञान क्षेत्रांतील गुंतवणूक आगामी तीन वर्षात वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. तरच देशांतर्गत उत्पादनात वाढ होऊन विकासाचा दर 8 टक्क्यापर्यत वाढवण्याचे ध्येय पूर्ण होईल असे नीती आयोगाचे सदस्य वी. के. सारस्वत यानी सांगितले.
नीती आयोग आणि दक्षिण आशियाई विकास संस्थेच्या एका कार्यक्रमावेळी ते म्हणाले की येणाऱ्य़ा काळात देशातील विज्ञान संशोधन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्य़ा संस्थांना चालना देण्याची गरज आहे. सरकारचे ध्येय मूलभूत विज्ञान संशोधन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्य़ा संस्थाना बळकटी देण्याचे आहे. त्यासाठी या क्षेत्रात गुंतवणूक वाढावी याकरीता प्रयत्न करण्यात येणार आहेत.