Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) यांनी ट्वीटद्वारे ठाकरे कुटुंब डेहराडूनला रवाना झाला, असल्याचा मोठा दावा केला आहे. भाजपच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) छत्तीसगडच्या दौऱ्यावर असल्याने उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) टीका केली होती. त्यावर जरांगे पाटील (Manoj Jarange) यांचे उपोषण सुटेपर्यंत तुम्हाला थांबता आले नाही? हीच का तुमची मराठा आरक्षणाची काळजी? असा सवाल करत टीका राणेंनी केली आहे.
मराठा आंदोलनादरम्यान देवेंद्र फडणवीस पक्षाच्या प्रचारासाठी छत्तीसगढ दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर टीका केली होती. मात्र आता नितेश राणेंनी पलटवार करत, “ठाकरे कुटुंब काल दुपारी 1 वाजता डेहराडूनला रवाना झाले आहे. हीच का तुमची मराठा आरक्षणाची काळजी? जरांगे पाटील यांचे उपोषण सुटेपर्यंत तुम्हाला थांबता आले नाही, असा थेट सवाल नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना केला. देवेंद्र फडणवीस पक्षाच्या कामासाठी गेले होते, कौटुंबिक सहलीसाठी गेले नव्हते असे म्हणत नितेश राणेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.
Someone tells me that the Thackray family has fled to Dehradun yesterday at 1 pm..
Along with their cook and staff..
From Gate number 8 .. private jet..This all their care about the Maratha reservation? Didn’t even bother till Jarange patil breaks his fast??
So why blame…— nitesh rane (@NiteshNRane) November 3, 2023
पुढे बोलताना, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना काही दिवसांत अटक होणार आहे. यामुळे उद्धव ठाकरे बिथरले आहेत, असा मोठा दावा देखील राणेंनी केला होता. आज पुन्हा नितेश राणेंनी आदित्य ठाकरेचे नाव न घेता डिवचले आहे. नितेश राणे म्हणाले, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात लवकरच बेबी पेंग्विनला प्रकरणात अटकेची शक्यता असल्याचे म्हटले होते.
त्यासोबतच दसरा मेळाव्यानंतर आदित्य ठाकरे देश सोडून जाणार आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान आत्महत्या प्रकरणातील अटक टाळण्यासाठी आदित्य हे पाऊल उचलणार आहेत असेही राणे म्हटले होते. त्यानंतर आता आज पुन्हा एकदा नितेश राणे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.