Nitesh Rane । लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी आता फक्त काही दिवस शिल्लक राहिले आहेत. एकीकडे प्रचाराचा धडका सुरु असताना महायुतीचा काही जागांवर तिढा कायम आहे. ठाणे, सिंधुदुर्ग, कल्याण, नाशिक येथील जागेवर महायुतीचा उमेदवार नाही. सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. या जागेवर शिवसेनेकडून दावा केला जात असल्यामुळे अद्याप उमेदवारी जाहीर केली गेली नाही. परंतु नारायण राणे यांनी प्रचार सुरु केला आहे. आता या प्रचार दरम्यान नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी सरपंचांना थेट इशाराच दिलाय.
काय म्हणाले नितेश राणे Nitesh Rane ।
सिंधुदुर्गमधील कणकवलीमध्ये नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा कार्यकर्ता संवाद मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना आमदार नितेश राणे यांनी सरपंचांना सज्जड दम दिला आहे. ते म्हणाले की. सरपंचांसहित कार्यकर्त्यांनी आपल्या निवडणुकांच्या वेळी जी यंत्रणा राबविली तीच यंत्रणा आता लावा. येत्या ४ जूनला सगळ्या सरपंचांचा हिशोब घेणार आहे. मला हवा तसं लीड मिळालं नाही तर मागणी असलेला निधी मिळणार नाही. मग मात्र माझी तक्रार करू नका, असा दम नितेश राणे यांनी भरला.
मग या शेंबड्या उद्धव ठाकरेला मोदी घाबरणार का? Nitesh Rane ।
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. नारायण राणे म्हणाले, संजय राऊत वेडा झालाय. खरच वेडा झालाय. मोदी साहेब म्हणे उद्धव ठाकरेंना घाबरतात. तुमचे पाच खासदार आणि मोदी साहेब यांना घाबरणार. अतिरेकी कारवाया करणाऱ्या शेजारच्या देशांना मोदींनी सांगितलय अतिरेकी कारवाया कराल तर घुसून मारू….असे आमचे मोदी साहेब. मग या शेंबड्या उद्धव ठाकरेला मोदी घाबरणार का? अशी टीका त्यांनी केलीय.