Parliament :‘ नारीशक्ती वंदन’ विधेयकावरील चर्चेदरम्यान संसदेत जोरदार गदारोळ झाला. शिवसेना खासदार अरविंद सावंत भाषण करत असताना भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टिप्पणी केल्याने विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला. या विधानानंतर सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. अरविंद सावंत यांनी विधेयकावर बोलताना केंद्र सरकारवर टीका केली. काही राज्यांच्या निवडणुका लक्षात घेऊनच हे विधेयक आणल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच भाजप नेत्यांवर महिला शोषणाचे आरोप असताना ते नारीशक्तीबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार गमावल्याचेही त्यांनी म्हटले. याचदरम्यान निशिकांत दुबे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने विरोधक आक्रमक झाले. सावंत यांच्यासह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, काँग्रेसचे गौरव गोगोई आणि इतर खासदारांनी दुबे यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. (Parliament) विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहता तालिका सभापतींनी हस्तक्षेप केला आणि दुबे यांचे संबंधित वक्तव्य पटलावर नोंदवले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर परिस्थिती काहीशी निवळली आणि अरविंद सावंत यांनी पुन्हा आपले भाषण सुरू केले. अरविंद सावंताच्या टीकेनंतर दुबेंचे वक्तव्य (Parliament) नारी शक्ती विधेयकावर बोलताना अरविंद सावंत म्हणाले की, महिला आरक्षण, महिला आरक्षणाच्या गप्पा मारता, आधी महिला संरक्षणावर चर्चा करा. कुलदीप सेंगर कोण आहे, कोणत्या पक्षाचा आहे. ब्रिजभूषणसिंह हे महिलांचा सन्मान करणारे आहेत का? असा सवाल खासदार अरविंद सावंत यांनी संसदेत उपस्थित केला. Parliament : निशिकांत दुबेंनी आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं अन् सुळे, सावंत भडकले; संसदेत जोरदार शाब्दिक चकमक, नेमकं काय घडलं? पुढे ते म्हणाले भाजप नेत आणि मंत्री राहिलेल्या कुलदीप सेंगर यांच्यावर बलात्काराचा आरोप असून त्यांना अटकही झाली होती. तर, ब्रिजभूषण सिंह यांच्यावरही महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले होते. त्यावरुन, अरविंद सावंत यांनी भाजपवर टीकेचे बाण सोडले. त्यानंतर खासदार निशिकांत दुबेंनी आदित्य ठाकरेंचं नाव घेत आक्षेपार्ह टीका केली. नारीशक्ती वंदन विधेयकाचा उद्देश काय? दरम्यान, महिला आरक्षणाशी मतदारसंघ फेररचना जोडण्याच्या मुद्द्यावरूनही विरोधकांनी सरकारवर टीका कायम ठेवली आहे. ‘नारीशक्ती वंदन’ विधेयक हे भारताच्या संसद आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना अधिक प्रतिनिधित्व मिळावे यासाठी आणलेले महत्त्वाचे घटनादुरुस्ती विधेयक आहे. लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये 33% (एक तृतीयांश) जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. या विधेयकाचा उद्देश राजकारणात महिलांचा सहभाग वाढवणे, निर्णयप्रक्रियेत महिलांचा आवाज बळकट करणे असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या विधेयकाच्या आडून मतदार संघाची फेररचना करण्याचा डाव सत्ताधाऱ्यांचा असल्याचा आरोप विरोधकांचा आहे. ( Parliament) हेही वाचा : आरसीबीला ‘ती’ कृती करणं पडलं महागात! सीएसकेने बीसीसीआयकडे केली तक्रार, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या