‘कोकणात मी माझ्या नातेवाईकांसाठी लढतोय, तुम्ही उपऱ्या…’; महाडमधील जाहीर सभेत उद्धव ठाकरेंचा घणाघात

रायगड – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज रायगड येथिल महाड येथे जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी भाजप-शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. त्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे…
– कोकणात मी माझ्या नातेवाईकांसाठी लढत आहे तर तुम्ही उपऱ्या लोकांसाठी लढत आहात.
-कर्नाटकमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी भाजपला बजरंगबलीच्या बलाची आवश्यकता भासते तर तुमचे बल गेलं कुठं? –
– रायगडमधील पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त गावातील पुनर्वसनाचे काम प्रशासनाने थांबवले
– कोकणी बांधवाच्या मनाविरोधात प्रकल्प रेटवणार असाल तर संघर्ष करू, सगळा महाराष्ट्र बारसूमध्ये आणू
-बारसूमध्ये सगळीकडे पोलीस…घरात पोलीस, गच्चीवर पोलीस…एवढा बंदोबस्त सीमेवर लावला असता तर चीन घुसला नसता…
-शिवसेना संपवली पाहिजे यासाठी काहींनी प्रयत्न केले. पण ज्यांनी शिवसेना वाढवली ते माझ्यासोबत आहेत.
– माझ्यावर टीका केल्याशिवाय काहींना भाकरीदेखील मिळत नसेल.
– सत्ता असते त्या ठिकाणी लोक जातात. आज माझ्याकडे सत्तादेखील नाही.
– भाजपने नीच डाव साधत पक्षाचं नाव, निवडणूक चिन्हं त्यांना दिले.
– माझ्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाशिवाय काहीच नाही. तरीदेखील अनेकजण पक्षात येत आहेत…याचं आश्चर्य वाटत आहे.





