नवी दिल्ली – देशात एकूण रूग्णसंख्येपेक्षा सक्रीय रुग्णसंख्या रोडावल्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रूग्णांची संस्था 2 टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत 15,144 नव्या रूग्णांची नोंद झाली. देशातील सक्रीय रुग्णसंख्या 2,08,826 इतकी कमी आहे. गेल्या 10 दिवसांपासून दर दिवशी नव्याने नोंद होणाऱ्या रुग्णांची संख्या 20,000 पेक्षा कमी झाली आहे.
गेल्या 24 तासांत 17,170 नवे रूग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रूग्णांचा वाटा 96 टक्के इतका आहे. 80 टक्के रूग्ण 10 राज्यांमधील आहेत. केरळमध्ये बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या सर्वाधिक असून 5,011 नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 3,039 रूग्ण बरे झाले असून त्याखालोखाल उत्तर प्रदेशात ही संख्या 930 इतकी आहे.
केरळमध्ये सर्वाधिक म्हणजे 5,960 रूग्णांची नोंद झाली आहे. त्या खालोखाल महाराष्ट्र आणि तामिळनाडू असून तेथे अनुक्रमे 2,910 आणि 610 नवे रूग्ण आढळून आले आहेत. दैनंदिन मृत्यूंच्या संख्येतही सतत घट होत आहे. गेल्या 23 दिवसांत दरदिवशी होणाऱ्या मृत्यूंची संख्या 300 पेक्षा कमी आहे.
गेल्या 24 तासांत 181 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात 52 लोकांचा मृत्यू झाला.केरळमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 27 असून पश्चिम बंगालमध्ये 15 मृत्यूंची नोंद झाली.