श्रीनगर : सध्या जम्मू आणि काश्मीर राज्य एका नवीन युगाकडे वाटचाल करत आहे. इथे विकास जमिनीवर दिसतो. आदर, समान संधी आणि स्वाभिमानाने भरलेल्या भविष्याकडे वाटचाल करत, काश्मीर आता नवीन भारताची ओळख बनत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी गुरुवारी सांगितले. काश्मीर विद्यापीठात विश्वग्रामने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राला संबोधित करताना शेखावत म्हणाले की, काश्मीर एकेकाळी नकारात्मक घटनांसाठी ओळखले जात होते, परंतु आता ती ओळख पूर्णपणे बदलली आहे. खोऱ्यात लाखो पर्यटकांचे पुनरागमन याचा पुरावा आहे. पर्यटन क्षेत्र सध्या भारताच्या जीडीपीमध्ये ५.६ टक्के योगदान देते, २०४७ पर्यंत ते १० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने अभूतपूर्व प्रगती केली आहे. लाखो किलोमीटर रस्ते, रेल्वे मार्ग आणि नवीन विमानतळ बांधले जात आहेत. काश्मीरमध्ये नव्या कार्स पोहोचल्या आहेत. त्यामुळे पर्यटनासाठी नवीन दरवाजे उघडले आहेत. जर पुढील २० वर्षांत भारतातील पर्यटन वाढ २० टक्क्यांपर्यंत पोहोचली तर काश्मीरमधील लोकांना सर्वाधिक फायदा होईल.