वडूज (प्रतिनिधी) – खटाव व माण तालुक्यांमध्ये नुकत्याच झालेल्या सरपंच, उपसरपंच निवडीत 120 पैकी 68 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे, असा दावा माजी आमदार प्रभाकर घार्गे आणि माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. काही ठिकाणी समविचारी पक्षांसोबत राष्ट्रवादी सत्तेत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
खटाव पंचायत समिती सभापती सौ. जयश्री कदम-पाटील, उपसभापती हिराचंद पवार, मनोज पोळ, सुभाष नरळे, श्रीराम पाटील, राष्ट्रवादीचे माण तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, वडूजचे नगराध्यक्ष सुनील गोडसे, विजय उर्फ मुन्ना खाडे, प्रा. कविता म्हेत्रे, माण पंचायत समितीचे उपसभापती तानाजी कट्टे, ज्ञानेश्वर शिंदे, गोविंद पवार उपस्थित होते.
खटाव तालुक्यातील अंबवडे, येळीव, लोणी, नांदोशी, कणसेवाडी, मानेवाडी (तुपेवाडी), डाळमोडी, गुंडेवाडी, तडवळे, नायकाचीवाडी, भुरकवडी, पेडगाव, जायगाव, पळशी, भोसरे, गुरसाळे, येरळवाडी, कातरखटाव, ढोकळवाडी, चितळी, तरसवाडी, उंबर्डे, गोसाव्याचीवाडी, गोपूज, नागाचे कुमठे, खबालवाडी, बोंबाळे, दातेवाडी, हिवरवाडी, कलेढोण, मुळीकवाडी, वरूड, कारंडेवाडी, कळंबी, तर माण तालुक्यातील इंजबाव,
काळचौंडी, किरकसाल, कुकुडवाड, खडकी, गोंदवले बुद्रुक व खुर्द, जांभुळणी, जाशी, डंगिरेवाडी, ढाकणी, दिवडी, देवापूर, धामणी, पर्यंती, पानवण, पिंगळी बुद्रुक, भाटकी, भालवडी, भांडवली, मार्डी, रांजणी, लोधवडे, वडजल, वरकुटे म्हसवड, वाकी, वारूगड, शिंदी व बुद्रुक, शिरवली, हवालदारवाडी या ग्रामपंचायती राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत, असे घार्गे व देशमुख यांनी सांगितले.
तटस्थ राहणाऱ्यांचेही स्वागत
ग्रामपंचायत निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते एकत्र येऊन लढतात. त्यांना कोणत्याही एका पक्षाची भूमिका न घेता तटस्थ रहावे लागते. अशी तटस्थ राहण्याची भूमिका घेतलेल्या पदाधिकाऱ्यांचेही आम्ही स्वागत करतो. विकासकामांबरोबर गावातील सलोख्याचे वातावरण टिकविण्यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून सहकार्य
राहील, असे आश्वासन प्रभाकर देशमुख यांनी दिले.
कराड उत्तर, कोरेगाव मतदारसंघातही मुसंडी
खटाव-माण मतदारसंघाव्यतिरिक्त खटाव तालुक्यातील ज्या ग्रामपंचायती कराड उत्तर व कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आहेत, तेथेही पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. कराड उत्तर मतदारसंघातील बहुतांश गावे राष्ट्रवादीमय झाली आहेत. कोरेगाव मतदारसंघातील खटाव व पुसेगाव गटांमधील अनेक ग्रामपंचायतींवर पक्षाचा झेंडा फडकला आहे, असा दावा प्रभाकर घार्गे यांनी केला.