नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. देशात लागू केलेले नवीन तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे. येत्या अधिवेशनात हे कायदे मागे घेतले जाणार असल्याचे मोदी यांनी सांगितले आहे. हे कायदे रद्द केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी ‘झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए’ असे ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
'झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए'
तीनों कृषि कायदे वापस लिए गए,
हमारे देश के किसानों को मेरा सलाम और शहीद किसानो को अभिवादन— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 19, 2021
नवाब मलिक म्हणाले की, ‘झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए’ शेतीचे तीनही कायदे मागे घेतले, देशातील शेतकऱ्यांना माझा सलाम आणि शहीद शेतकऱ्यांना अभिवादन असे ट्विट मलिक यांनी केले आहे.
देशात लागू करण्यात आलेल्या तीन नवीन कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन केले आहे. त्या आंदोलनाला आज खऱ्या अर्थाने यश मिळाले असल्याची भावना सर्वस्तराकडून व्यक्त केली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्याच्या या महामोहिमेत देशात तीन कृषी कायदे आणण्यात आले होते. देशातील शेतकर्यांना विशेषत: लहान शेतकर्यांना अधिक बळ मिळावे, त्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा आणि शेतमाल विकण्याचे अधिकाधिक पर्याय उपलब्ध व्हावेत, हा उद्देश होता.
वर्षानुवर्षे देशातील शेतकरी, देशातील कृषी तज्ज्ञ, देशातील शेतकरी संघटना सातत्याने ही मागणी करत आहेत. यापूर्वीही अनेक सरकारांनी यावर विचारमंथन केले होते. यावेळीही संसदेत चर्चा झाली, मंथन झाले आणि हे कायदे आणले गेले. देशाच्या कानाकोपऱ्यातील अनेक शेतकरी संघटनांनी त्याचे स्वागत व पाठिंबा दिला. त्या सर्वांचा मी आज खूप ऋणी आहे.
आज मी तुम्हाला, संपूर्ण देशाला सांगण्यासाठी आलो आहे की, आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात आम्ही हे तीन कृषी कायदे रद्द करण्याची घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करू. अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली आहे.