Naveen Patnaik : सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधावा; नवीन पटनायक यांचा केंद्र सरकार सल्ला
बिजू जनता दल (बीजेडी) प्रमुख नवीन पटनायक (Naveen Patnaik) यांनी रविवारी कथित परीक्षा अनियमिततेविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा सुरू करण्याचे आवाहन केंद्र सरकारला केले.

Naveen Patnaik : बिजू जनता दल (बीजेडी) प्रमुख नवीन पटनायक (Naveen Patnaik) यांनी रविवारी कथित परीक्षा अनियमिततेविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा सुरू करण्याचे आवाहन केंद्र सरकारला केले. ते म्हणाले की, या विषयावर संसदेत गांभीर्याने चर्चा झाली पाहिजे. परीक्षेतील कथित अनियमिततेच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करत आहे.
प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांनंतर नीट-युजी परीक्षा रद्द केल्याबद्दल हे आंदोलक केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचीही मागणी करत आहेत.
ओडिशा विधानसभेतील विरोधी पक्षनेते नवीन पटनायक (Naveen Patnaik) यांनी म्हटले आहे की, राजकारणाच्या पलीकडे जाऊन, मी सरकारला आवाहन करतो की, जे विद्यार्थी अनेक दिवसांपासून शांततेने आंदोलन करत आहेत, त्यांच्याशी अर्थपूर्ण संवाद सुरू करावा. त्यांना त्यांची मते मांडण्यासाठी एक व्यासपीठ दिले पाहिजे.
परीक्षांच्या आयोजनातील कथित गैरव्यवस्थापनाबद्दल सरकारने जबाबदाने वागायला हवे. असे न झाल्यामुळे जनतेचा विश्वास उडाला आहे. एक मजबूत लोकशाही संवादावर अवलंबून असते, मौनावर नाही. जेव्हा देशातील तरुणांचा प्रश्न येतो, तेव्हा हा संवाद अधिकच महत्त्वाचा ठरतो. या मुद्द्यामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे, हा मुद्दा संसदेत सर्वोच्च प्राधान्याने मांडला पाहिजे.
पटनायक (Naveen Patnaik) पुढे म्हणाले की, लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेत या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली पाहिजे. भविष्यात पेपरफुटी, चुकीचे मूल्यांकन आणि प्रणालीगत त्रुटी टाळण्यासाठी एक भक्कम यंत्रणा कार्यान्वित केली पाहिजे. पटनायक म्हणाले की, भारताच्या तरुणांना देशाच्या सध्याच्या नेतृत्वाकडून खूप अपेक्षा आहेत.
आपण देशभरातील विद्यार्थ्यांना निराश करू शकत नाही. शांततेने आंदोलन करणाऱ्या तरुणांशी प्रामाणिक आणि मोकळा संवाद साधल्यास लोकशाही, शिक्षण व्यवस्था आणि देशाच्या नेतृत्वावरील लोकांचा विश्वास दृढ होईल. आमचा पक्ष बिजू जनता दल देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. देशातील लाखो मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे. प्रत्येक विकसित देशाचा पाया एका मजबूत शिक्षण व्यवस्थेवर आणि पारदर्शक व विश्वासार्ह परीक्षा प्रणालीवर अवलंबून असतो.
– नवीन पटनायक, ओडिशाचे माजी मुख्यमंत्री






