मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सभा आज वर्ध्यात आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर टीका केली. राष्ट्रवादी नेते अजित पवारांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची विकेट काढली आहे.तसेच राष्ट्रवादीमध्ये गृहयुद्ध सुरु असल्याची टीका त्यांनी केली.
यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, शरद पवारांच्या कुटुंबात झाकण्याऐवजी थोडा स्वतःचा परिवार सांभाळा. लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी याना घरी बसवले ते जनतेला सांगा, असे ते म्हणाले.
तसेच, नरेंद्र मोदींनी केलेले भाषण एका पंतप्रधानांना न शोभणार होत. मोदींनी ५ वर्षात काय केले, देशात किती नोकऱ्या आल्या, महागाई किती कमी झाली, शेतकरी आत्महत्या, आत्म्हत्याग्रस्त शेतकऱ्यांसासाठी काय केलं ? कर्जमाफीच काय झालं ? हे मुद्दे सोडून जुमलेबाजी आणि लोकांना गोलगोल फिरवण्याशिवाय मोदी साहेब काहीच करत नाहीत,अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.
शरद पवारजी के परिवार मे मत झाकीये,
थोडा अपने परिवार को भी संभालीये,
लालकृष्ण आडवाणी और मुरली मनोहर जोशी जैसे को घर कैसे बिठाया ये तो बतलाईये,
चुनाव है, चुनावी भाषण किजीये,
मोदीजी मुद्दे पर तो आईये#मोदी_मुद्दे_पे_आइये#modi pic.twitter.com/iojtOYtecA— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 1, 2019