Bhandup accident : भांडुप येथील अपघातानंतर पुन्हा एकदा इलेक्ट्रिक बसचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. २९ डिसेंबर २०२५ वार सोमवार काळ बनून आला आणि क्षणात होत्याच नव्हतं झालं. भांडुप येथे बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात चार जणांना आपले प्राण गमावले लागले आहेत. या अपघातात एकूण १३ जणांना बसने उडवले होते. हा अपघात घटनास्थळी उपस्थित असलेल्या अनेकांच्या डोळ्यादेखत झाल्याने त्यांचा थरकाप उडला. अपघातानंतर भांडूपमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्या दिवशी अपघात झाला त्यादिवशी नेहमी सारखीच गर्दी येथे होती. अत्यंत गजबजलेल्या भांडूप पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर बस स्थानकाबाहेर नेहमीप्रमाणे प्रवासी बसची वाट पाहत उभे होते. पण अचानक समोरून आलेल्या बसने बसस्थानकासमोर उभ्या असलेल्या १३ जणांना उडवले. या अपघातात मराठी मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या एका बालकलाकाराने डोळ्यादेखत आईचे प्राण जाताना पाहिले. पूर्वा रासम (वय वर्ष 11) असे बालकलाकाराचे नाव आहे. तिची आई प्रणिता रासम यांचा अपघातात दुर्देवी मृत्यू झाला आहे. पूर्वा आणि तिचा आई दोघेही मायलेकी शूटिंग संपल्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्या घरी जाण्यासाठी भांडूप स्थानकावर बसची वाट पाहत उभ्या होत्या. पण समोरून आलेली बस अनेकांच्या अंगावरून गेली. या अपघातात पूर्वाची आई देखील चिरडली गेली. तर पूर्वा बाजूला फेकली गेली. त्यामुळे अपघातात तिचा जीव वाचला पण तिच्यावरचे आईचे छत्र कायमच हिरावले गेले आहे. अपघातानंतर स्थानिकांनी अपघातग्रस्तांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, या अपघातात काहींचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. मंगळवारी पूर्वा हिच्या आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पूर्वाने टाहो फोडला. आईचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे तिने व्यवस्थेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. पूर्वाने व्यक्त केला संताप पूर्वाने इलेक्ट्रिक बसेसचा आवाजच येत नाही. आधीच्या बसेसचा आवाज यायचा, त्यामुळे लोक बाजूला व्हायचे. पण ही बस मागून कधी आली आणि आईला चिरडून गेली ते समजलंच नाही. माझी आई आता परत येणार नाही, पण या बसेस तातडीने बंद करा, आणखी कोणाचे बळी घेऊ नका!” अशी शब्दांत तिने संताप व्यक्त केला आहे. रासम कुटुंब हे मूळचे कुडाळ येथील आहेत. सध्या ते भांडुपमधील एका लहानशा खोलीत राहत होते. प्रणिता यांच्या पश्चात पती, मुलगी पूर्वा आणि ७ वर्षांचा मुलगा अथर्व असा परिवार आहे. हेही वाचा : “हिंदू तरुणांनी टिकून राहण्यासाठी ISIS सारखी संघटना स्थापन करावी,” ; यति नरसिंहानंद गिरी यांचे वादग्रस्त विधान