अंबरनाथ – दारू पिताना वाद झाल्याने मित्रानेच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना अंबरनाथ येथील दत्त कुटीर परिसरात आज पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीसांनी आरोपी आशुतोष कराळे (वय 19) याला अटक केली आहे.
अमन शेख (वय 18) आणि आरोपी आशुतोष हे दोघे मित्र होते. तीन-चार दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाले होते. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री ते एकत्र दारू पीण्यासाठी बसले तेंव्हा त्यांच्यात पुन्हा वाद झाला.
यावेळी अमन अशुतोषला “तू घरी जा’ असे म्हणाला. अमनच्या या बोलण्याचा राग आल्याने आशुतोषने अमनच्या पोटात चाकूने वार केले. यात अमनचा
जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलीसांनी आरोपी आशुतोष याच्यावर गुन्हा दाखल त्याला अटक केली आहे. पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक मंजितसिंग बग्गा करत आहेत.