हिंगोली – वसमत तालुक्यातील कळवा पाटीजवळ नोव्हेंबर 23 रोजी सोमवारला एका युवकाचा पोलिसांना मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी एका दिवसातच तपासाची चक्रे फिरवून युवकाचा खून झाल्याचे स्पष्ट केले, अशी नोंद हट्टा पोलीस स्टेशन डायरीत आहे.
ज्ञानेश्वर हा एका तरुणीशी फोनवर सतत बोलायचा. त्याचा मित्र प्रमोद याचे त्या तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. ज्ञानेश्वर तिच्याशी फोनवर बोलतो, हे कळल्यावर प्रमोदच्या मनात राग निर्माण झाला होता. त्याने अनेकवेळा ज्ञानेश्वरला याबाबत समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे फोनवर बोलणे सुरूच होते.
त्यामुळे प्रमोदचा राग अनावर होऊन त्याने ज्ञानेश्वरचा काटा काढायचे ठरवले. त्याने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने ज्ञानेश्वरचा खून केला. त्याच्या डोक्यात शस्त्राने वार करून त्याचा मृतदेह कळंबा पाटीजवळच्या शेतात फेकून दिला. तसेच संशय येऊ नये म्हणून त्याची दुचाकी एका पुलाखाली फेकून दिली.
त्यानंतर पोलिसांनी प्रमोद आप्पासाहेब खाडे, विनोद भीमराव कापुरे आणि प्रवीण लक्ष्मण अंभोरे या तिघांना ताब्यात घेतले. या तिघांची कसून चोकशी केली. त्यावेळी प्रमोदने खून केल्याचे कबूल केले.