Devendra Fadnavis : मुंडे साहेबांनी आणि मी दिल्ली गाठली; रामदास आठवलेंच्या खासदारकीची फडणवीसांनी सांगितली जुनी आठवण
Devendra Fadnavis : या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदास कदम यांच्याविषयी गौरवोद्धार काढत एक खास आठवण सांगितली.

Devendra Fadnavis : मुंबईत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांचा केंद्रीय मंत्रिपदाच्या दशकपूर्तीनिमित्त नागरी सत्कार समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांसह अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदास कदम यांच्याविषयी गौरवोद्धार काढत एक खास आठवण सांगितली.
“डॉ. रामदास आठवले हे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील दिलखुलास राजकीय व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी अनेक दशके एका विचाराकरिता समर्पित असे जीवन जगले, जनसामान्यांचे नेते म्हणून सातत्याने आपली राजकीय कारकीर्द चालवली, अशा भारत सरकारच्या राज्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात १० वर्षे पूर्ण केल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो,” असे देवेंद्र फडणीस म्हणाले.
मुंडे साहेबांनी सांगितलं की आपल्याला आठवले साहेबांना राज्यसभेवर पाठवायच आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक खास जुनी आठवण सांगितली. ते म्हणाले, “खरं म्हणजे मी ज्यावेळी भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष झालो, त्यावेळी आठवले साहेब हे नुकतेच महायुतीमध्ये आले होते. तेव्हापासन त्यांचं माझा संबंध जुळला त्याच्या आधी महाराष्ट्रातलं एक मोठं व्यक्तिमत्व एक नेते अशा पद्धतीने मी आठवले साहेबांना ओळखायचो; पण प्रत्यक्ष त्यांची फारशी माझी ओळख नव्हती. पण त्या काळामध्ये ओळख झाली नंतर मला मुंडे साहेबांनी सांगितलं की आपल्याला आठवले साहेबांना राज्यसभेवर पाठवायच आहे. त्यावेळी प्रकाशजी जावडेकर त्या जागेवर होते.”
मला अतिशय आनंद आहे की त्यावेळी आमच्या वरिष्ठांनी ऐकलं
यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः रामदास आठवले यांच्या राज्यसभेच्या खासदारकीसाठी पुढाकार घेतला. त्यावेळी गोपीनाथ मुंडे आणि देवेंद्र फडणवीस दोघेही दिल्लीत जाऊन भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली आणि आठवले साहेबांसारखं एक मोठं नेतृत्व आज आपल्या महायुतीत आलय आणि निश्चितपणे त्यांना आपण राज्यसभेवर पाठवलं पाहिजे, अशी मागणी वरिष्ठ नेत्यांकडे केली. येणाऱ्या लोकसभेमध्ये त्यानंतर विधानसभेमध्ये निश्चितपणे जो आमचा संपूर्ण आंबेडकरी समाज आहे त्या समाजाच्या मनामध्ये आपल्या महायुवतीच्याबद्दल एक विश्वास देखील तयार होईल. मला अतिशय आनंद आहे की त्यावेळी आमच्या वरिष्ठांनी ऐकलं, अशी जुनी आठवण फडणवीसांनी सांगितली.





