अनिल कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी या सुपरहिट जोडीने गाजवलेला “मिस्टर इंडिया’ नव्वदचे दशक गाजवणारा सुपरहिट चित्रपट ठरला होता. मिस्टर इंडिया चित्रपटात दिवंगत जेष्ठ अभिनेते अमरीश पुरी, दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी साकारलेल्या भूमिका खूप गाजल्या होत्या. त्याचप्रमाणे या चित्रपटाची बालकलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली होती. आज या चित्रपटाला नुकतेच ३३ वर्ष पूर्ण झाले असून अभिनेता अनिल कपूरने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
या चित्रपटातील प्रत्येक भूमिका आजही प्रेक्षकांची तितकीच पसंती आहे . आजही प्रेक्षक या चित्रपटाची भूमिकांचे चांगलेच कौतुक करतांना दिसून येतात. अनिल कपूरने या चित्रपटातील ‘जिंदगी की यहीं रित हैं’ हे गाणं शेअर केलं असून त्याला सुंदर कॅप्शन दिलं आहे.