Rss Chief Mohan Bhagwat । झारखंडमधील गुमला येथे ग्रामस्तरीय कार्यकर्ता संवाद कार्यक्रमादरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी १८ जुलै अनेक मुद्यांवर भाष्य केले. मोहन भागवत म्हणाले, लोकांना मानवातून सुपरमॅन, देवातून सुपरमॅन, देवातून देवता व्हायचे आहे. त्यावरून राजकीय चर्चाही सुरू झाली. या विधानावर आता काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अग्नी क्षेपणास्त्र डागल्याची बातमी मिळाली असावी. असेही काँग्रेस नेते म्हणाले.Rss Chief Mohan Bhagwat । सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले… ‘प्रगतीला अंत नाही. लोकांना सुपरमॅन व्हायचे असते, इतकऱ्यावरच न थांबता त्यांना यानंतर ‘देव’ बनायचे असते, आणि भगवानही बनायचे असते.तो ‘विश्वरूप’ आहे. यापेक्षा मोठे काही नाही हे कोणालाच माहीत नाही. विकासाला अंत नाही. आपण विचार केला पाहिजे की अधिक गोष्टींसाठी नेहमीच जागा असते. हे कार्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे. आपण नेहमी विकासासाठी अधिक प्रयत्न केले पाहिजे.’ ते असेही म्हणाले की, ‘देशाच्या भवितव्याबद्दल त्यांना कधीही चिंता वाटली नाही, कारण अनेक लोक देशाच्या भल्यासाठी एकत्र काम करत आहेत, ज्याचे परिणाम दिसून येतील.”Rss Chief Mohan Bhagwat । मोहन भागवत यांच्या या विधानावर जयराम रमेश पंतप्रधान मोदींच नाव घेत सडकून टीका केली “मला खात्री आहे की स्वयंघोषित नॉन-बायोलॉजिकल पंतप्रधानांना या ताज्या अग्नी क्षेपणास्त्राची बातमी मिळाली असावी, जे झारखंडमधून नागपुरातून लोककल्याण मार्गाला लक्ष्य करून डागण्यात आले होते.’ Rss Chief Mohan Bhagwat । सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे मोहन भागवत यांचे हे वक्तव्य समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. काँग्रेससह अनेक लोक याला पीएम मोदींच्या दैवी शक्तीच्या वक्तव्याशी जोडत आहेत. अनेकांनी विचारले की मोहन भागवत हे कोणासाठी बोलत आहेत? काँग्रेसच्या प्रवक्त्या रितू चौधरी म्हणाल्या की नेमकं तुम्ही कुणाला ट्रोल करत आहेत? ते आमचे नॉन-बायोलॉजिकल पंतप्रधान आहेत का? असं म्हणत मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे.