Mohan Bhagwat । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी अलीकडेच एक मोठे विधान केले आहे.ज्या -ज्या ठिकाणी संघ आहे तिथे हिंदूंचे पाणी, जमीन, घरे, मंदिरे आणि स्मशानभूमी यांचे रक्षण करावे लागेल,”असे त्यांनी म्हटले होते. त्यासोबतच स्वदेशी आचरण स्वीकारण्याचे आणि मातृभाषेला प्राधान्य देण्याचे आवाहनही त्यांनी केले. त्यासोबतच त्यांनी आवश्यकतेनुसार इंग्रजी बोलता यायला हवी असेही म्हटले. दरम्यान, मोहन भागवत यांच्या या विधानावर आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. याविषयी बोलताना, “हिंदू समाजातील दलित, आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या जमिनी सतत हिसकावून घेतल्या जात आहेत. प्रशासन, माफिया आणि मोठ्या कंपन्यांकडून जबरदस्तीने केलेल्या कब्ज्याविरुद्ध आरएसएस आणि सरकार कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी मोहन भागवत यांना विचारले की त्यांचे सरकार आणि संघटना या मुद्द्यावर काय करत आहे. मोहन भागवतांच्या विधानावर संजय सिंह यांचा सवाल Mohan Bhagwat । संजय सिंह यांनी इंग्रजी भाषेवरील त्यांच्या विधानावरूनही संघ प्रमुखांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, उत्तर प्रदेश विधानसभेत अलीकडेच इंग्रजीचा समावेश करण्यात आला आहे, तर संघ प्रमुख त्याला विरोध करत असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी असा दावा केला की संघ आणि भाजपमध्ये अंतर्गत मतभेद असू शकतात जे आता सार्वजनिकरित्या दिसून येऊ लागलेत. महाकुंभच्या पाण्याबाबतही प्रश्न Mohan Bhagwat । याशिवाय संजय सिंह यांनी महाकुंभाच्या पाण्याच्या गुणवत्तेवरही प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ ते आंघोळीसाठी योग्य मानत नाही तर उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळ ते आंघोळीसाठी योग्य असल्याचे म्हणत आहे. “या मुद्द्यावर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यातील मतभेदांकडेही लक्ष वेधले. हेही वाचा मृत्यूशी झुंज ! ४५ तासांनंतरही बोगद्यात अडकले ८ कामगार ; चिखल अन् ढिगाऱ्यामुळे बचावकार्यात अडथळा