नवी – देशातल्या पुरग्रस्त राज्यांच्या स्थितीच्या संबंधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी फोन वरून संपर्क साधून त्यांच्या राज्यातील स्थितीची माहिती घेतली. बिहार, आसाम, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडु, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये तुफान पावसामुळे अनेक ठिकाणी गंभीर पुरस्थिती उद्भवली आहे.
आसामातील 26 जिल्ह्यातल्या सुमारे 30 लाख लोकांना पुराचा तडाखा बसला आहे. तेथे ब्रम्हपुत्रा नदीच्या पुरात सुमारे 1 लाख 18 हजार हेक्टर शेतीक्षेत्र पुराखाली गेले आहे. तामिळनाडुतही पुराने मोठे नुकसान झाले असून अन्य राज्यातही पावसाचे प्रमाण वाढत असल्याने तेथे चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांनी फोन वर चर्चा करून तेथील स्थिती जाणून घेतली.