नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 80 कोटी जनतेसाठी येत्या नोव्हेंबरपर्यंत मोफत अन्नधान्य योजना राबवण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचे केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्वागत केले आहे. देशात कोणीही उपाशी झोपणार नाही याची काळजी या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी घेतली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
या योजनेत पाच किलो धान्य व एक किलो डाळ मोफत दिली जाणार आहे. ही योजना सुरू झाली तेव्हा ती फक्त तीन महिन्यांसाठीच होती. जावडेकर म्हणाले की, देशातील 80 कोटी लोकांना याचा लाभ होईल म्हणजे 16 कोटी कुटुंबांना 25 किलो अन्नधान्य आणि पाच किलो डाळ पुढील पाच महिने मोफत पुरवली जाणार आहे. जगातल्या अन्य कोणत्याही देशाने अशी अन्नसुरक्षा योजना दिलेली नाही, असे ते म्हणाले.