saamana-editorial : काल देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. पश्चिम बंगलामध्ये भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. या यशामागे मोदी आणि शाह यांची व्यूहरचना गेमचेंजर ठरली. या निवडणुकीत तामिळनाडूमध्ये देखील विजयला मोठा विजय मिळाला. केरळमध्येही बदल झाला. तिथे काँग्रेसने बाजी मारली. या निकालावर दैनिक सामानातून भाष्य करण्यात आले असून, हे जिंकतात तरी कसे या मथळ्याखाली भाजपवर टीका करण्यात आली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल भारतीय जनता पक्षाने जसे ठरवले होते त्याप्रमाणेच लागले आहेत. मोदी-शहा यांनी निवडणुका ताब्यात घेण्याचा एक ‘पॅटर्न’ ठरवला आहे. त्या पॅटर्ननुसार भाजपने आसाम आणि प. बंगाल जिंकले. त्याच पॅटर्ननुसार तामीळनाडूत सत्तापरिवर्तन घडवून ‘द्रमुक’ला बाहेर काढले, असे म्हटले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला मिळालेले यश अभूतपूर्व आहे. यावर भाष्य करताना सगळ्यात जास्त उत्कंठा प. बंगालात काय घडेल याची होती! ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने याआधीच्या तीन निवडणुका सलग जिंकल्या. या काळात ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी मोदी-शहांनी जंग जंग पछाडले, पण ममता यांचा पराभव करणे त्यांना जमले नाही. मात्र यावेळी मोदी-शहांना निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या रूपाने तिसरा भिडू मिळाला. त्यामुळे भाजपला आताच्या निवडणुकीत यश मिळाले. लोकशाहीत निवडणुका निष्पक्ष रीतीने झाल्या तर ‘पराभव’ही दिलदारीने स्वीकारायचा असतो. जनतेचा कौल म्हणून पराभव मान्य करायचा असतो, पण सध्या ज्या पद्धतीने निकाल लावले जात आहेत त्यास जनतेचा कौल मानता येत नाही, तर निवडणूक आयोगाच्या सहकार्याने भाजपने लावलेले कौस म्हणावे लागले, अशी बोचरी टीका केली आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातील काही महत्वाचे मुद्दे प. बंगालातील विजयानंतर भाजपचे पुढारी म्हणाले, ममता बॅनर्जी यांना हिंदूंनी मतदान केले नाही. भाजपचा निवडणुका लढण्याचा हाच ‘पॅटर्न’ आहे. देशभरात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. महाराष्ट्रात चिमुकल्या मुलींवर बलात्कार करून त्यांना ठार केले जात आहे. मात्र लोक हे सर्व स्वीकारतात. भाजपच्या या जुलमी राजवटीस मतदान करतात. पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल भारतीय जनता पक्षाने जसे ठरवले होते त्याप्रमाणेच लागले आहेत. मोदी-शहा यांनी निवडणुका ताब्यात घेण्याचा एक ‘पॅटर्न’ ठरवला आहे. त्या पॅटर्ननुसार भाजपने आसाम आणि प. बंगाल जिंकले. त्याच पॅटर्ननुसार तामीळनाडूत सत्तापरिवर्तन घडवून ‘द्रमुक’ला बाहेर काढले. अभिनेता विजय याच्या ‘टीव्हीके’ पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही, पण मतविभागणी करून टीव्हीके शंभरपेक्षा जास्त जागा जिंकणार, हे निश्चित झाले आहे. द्रमुक-काँग्रेस युतीला 70 च्या आसपास जागा तर भाजप-अण्णा द्रमुक युतीला 50 च्या मागे-पुढे जागा मिळतील. केरळात काँग्रेसने मुसंडी मारली, तर आसामात भाजपने मोठे यश मिळवले. पुद्दुचेरीत भाजपने पुन्हा सत्ता राखली. पाच राज्यांतील निवडणूक निकाल भाजपसाठी ‘गेम चेंजर’ ठरले, पण हे निकाल सरळ मार्गाने आल्याचे दिसत नाही. सगळ्यात जास्त उत्कंठा प. बंगालात काय घडेल याची होती! ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने याआधीच्या तीन निवडणुका सलग जिंकल्या. या काळात ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी मोदी-शहांनी जंग जंग पछाडले, पण ममता यांचा पराभव करणे त्यांना जमले नाही. मात्र यावेळी मोदी-शहांना निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या रूपाने तिसरा भिडू मिळाला. त्यामुळे भाजपला आताच्या निवडणुकीत यश मिळाले. प. बंगालमध्ये भाजप जिंकला त्याचे श्रेय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना द्यावे लागेल. अभिनेता विजय याच्या टीव्हीके पक्षाला भरघोस मतदान झाले. द्रमुकचे नेते व मुख्यमंत्री स्टॅलिन हे तामीळ अस्मितेसाठी लढत होते. त्यांनी पुन्हा एकदा टोकाचा हिंदी विरोध केला. त्याचा फटका त्यांना बसला काय? पिढी व मतदारांचा विचार बदलतो आहे याचा विचार जुन्या पठडीतले नेते आणि पक्ष करायला तयार नाहीत. त्यामुळे द्रमुक-अण्णा द्रमुकला सोडून तामीळ जनतेने तिसरा पर्याय निवडला. लोकांना बदल हवा असतो हे मान्य, पण मग ते आसामातील भाजपचे अराजक का बदलत नाहीत? मोदी-शहांची व्यापारी पद्धतीची राज्य व्यवस्था देशात अपयशी ठरली आहे. हेही वाचा : Nasrapur case : नसरापूर प्रकरणातील मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; अंगावर काटा आणणारा तपशील, नराधमाने…