नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (दि. २०) ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. परीक्षेच्या काळात तणावमुक्त कसं रहावं याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना कानमंत्र दिला.
दरम्यान, देशभरातील विविध शाळांमध्ये ‘परीक्षा पे चर्चा’चे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडिअम येथून पंतप्रधानांनी सर्वांशी थेट संवाद साधला. प्रश्नोत्तरांच्या स्वरुपात हा संवादाचा कार्यक्रम पार पडला.