कराड – केंद्रीय तपास यंत्रणांचा नरेंद्र मोदी सरकारकडून गैरवापर होत आहे. त्यामुळे लोकांमध्ये भाजपविषयी तीव्र नाराजी आहे. राज्यात आणि देशात भाजपविरोधी वातावरण निर्माण होऊ लागले आहे. आगामी निवडणुका महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि डाव्या पक्षांनी एकत्रित लढवाव्यात, असा आमचा विचार आहे. याबाबत अद्याप एकत्र बसून, चर्चा झालेली नाही. तशी चर्चा व्हावी, अशी माझी इच्छा आहे, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
कराड येथे रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे उपस्थित होते. पवार म्हणाले, तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर झालेली कारवाईही याचाच भाग आहे. सिसोदियांनी शिक्षण क्षेत्रात उत्तम काम केले आहे; परंतु मद्य धोरणावरून त्यांच्यावर कारवाई झाली. दिल्लीत मद्यावर मोठा कर आकारला जात होता. तो कमी केल्याने चोरटी आयात थांबली. हा निर्णय महाराष्ट्रातसुद्धा झाला होता. मात्र, त्यावरूनच कारवाई होऊन सिसोदियांना अटक झाली.
भाजपविरोधी नेत्यांवर कारवाया होत आहेत. आठ राज्यांमधील नेत्यांवर अशा पद्धतीने कारवाया करण्यात आल्या आहेत. कारवाया झालेल्या नेत्यांच्या नावांची यादी पंतप्रधानांना पत्राद्वारे पाठवण्यात आली. ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांच्यावरील खटले काढून घेण्यात आले. हा प्रकार धक्कादायक असून, हे योग्य नसल्याचे त्या पत्रात म्हटले आहे. संजय राऊत यांच्यावर विधिमंडळात सुरू असलेल्या हक्कभंग कारवाईबाबत विचारले असता, ते म्हणाले, हक्कभंग समिती स्थापन करण्याचे अधिकार विधानसभेला आहेत; वर्मा म्हणाले, विधीमंडळ पक्षाच्या पहिल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली आहे.
आम्ही आमदारांची मते आणि राज्य पक्षाच्या नेत्यांची मते जाणून घेतली आहेत. सरकारमध्ये सामील व्हायचे की विरोधी पक्षात राहायचे यावर येत्या दोन दिवसांत दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना माहिती देईन, असे वर्मा म्हणाले. दरम्यान, 27 फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने 60 सदस्यीय विधानसभेच्या 12 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यातील सात जागा त्यांनी जिंकल्या आहेत.
मोदी सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर
परंतु संजय राऊत यांच्यावर कारवाईसाठी आक्रमक आणि आग्रही असलेल्या आमदारांचीच समिती नेमणूक झाली आहे. त्यामुळे कारवाईच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कांद्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, नाफेडने मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी करून, शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. कसबा पोटनिवडणूक निकालाबाबत ते म्हणाले, पारंपरिक मतदारांनी भाजपाला नाकारले. असाच सूर उत्तर ईशान्यमध्ये झालेल्या निवडणुकांमध्येही होता. नागालॅंड आणि मेघालयमध्ये राष्ट्रवादीने निवडणुका लढविल्या. नागालॅंडमध्ये अधिक लक्ष घातले. तेथे आम्हाला सात जागा मिळून, विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळाले. इतर राज्यांमध्येही असेच लक्ष घातले, तर चित्र बदललेले दिसेल.