Miraj Panchayat Samiti : मिरज पंचायत समितीच्या उद्घाटनावरून राजकीय आखाडा; भाजप वि. विशाल पाटील वाद पेटला!
मिरज पंचायत समितीच्या (Miraj Panchayat Samiti) नूतन इमारतीच्या उद्घाटनावरून सुरू झालेला वाद आता चांगलाच पेटला असून, खासदार विशाल पाटील यांच्या वक्तव्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मिरजेचे भाजप आमदार सुरेश खाडे यांनी खासदारांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे.

Miraj Panchayat Samiti : मिरज पंचायत समितीच्या (Miraj Panchayat Samiti) नूतन इमारतीच्या उद्घाटनावरून सुरू झालेला वाद आता चांगलाच पेटला असून, खासदार विशाल पाटील यांच्या वक्तव्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मिरजेचे भाजप आमदार सुरेश खाडे यांनी खासदारांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे.
या वादामुळे सांगली जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मिरज पंचायत समितीच्या (Miraj Panchayat Samiti) नूतन इमारतीचे दोन वेळा उदघाटन झाल्याने वाद पेटला.
सत्ताधारी महाविकास आघाडीकडून प्रशासकीय उदघाटनाला डावलण्यात आल्याचा आरोप करत, शासकीय उद्घाटन सोहळ्याच्या आदल्याच दिवशी स्वतंत्र उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला. या सोहळ्यात खासदार विशाल पाटील यांनी शासकीय निधीवरून प्रशासनावर तोंडसुख घेत टीकास्त्र सोडले होते.
याचे तीव्र पडसाद (Miraj Panchayat Samiti) प्रशासनाकडून आयोजित अधिकृत उद्घाटन सोहळ्यात उमटले. भाजप नेत्यांनी व्यासपीठावरून खासदार विशाल पाटील यांच्यावर जहरी टीका केली. “उद्घाटन करायची एवढीच खुमखुमी असेल, तर खासदार फंडाबाहेरून स्वतःच्या खिशातून एक रुपयाचा निधी आणून विकास करा आणि मग रुबाब दाखवा,” असा जळजळीत टोला भाजप नेत्यांकडून लगावण्यात आला.
माजी मंत्री व आमदार सुरेश खाडे यांनी तर आणखी आक्रमक पवित्रा घेत, “तुमच्या वडिलांची इमारत स्वतःच्या पैशातून बांधलेली नसून शासकीय निधीतूनच उभारण्यात आली होती. मात्र, यापुढे तुम्हाला विकासकामे स्वतःच्या वडिलांच्याच पैशातून करावी लागतील,” असे थेट आव्हान खासदार विशाल पाटील यांना दिले.
दरम्यान, या वादावर खासदार विशाल पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सुरेश खाडे यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या असून, या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीमुळे मिरज पंचायत समितीचा (Miraj Panchayat Samiti) उद्घाटन सोहळा हा विकासकामांपेक्षा राजकीय जुंपण्याचा आखाडा ठरल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.






