चिंबळी- करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात 14 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुखमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला असल्यामुळे 25 मार्चपासून देशभरात कडक संचारबंदी लागू झाली आहे.
या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर चिंबळी (ता. खेड) येथील शांताई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संजय जैद व शांताई इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष अनुराग जैद यांच्या वतीने एक सामाजिक कार्य म्हणून दोनशे नागरिकांना मास्क वाटप माजी सभापती विलास कातोरे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विकास अवघडे, बाळासाहेब जाधव, चेतन बर्गे, अमोल बहिरट, आकाश पाटोळे उपस्थित होते.