Manoj Jarange | Devendra Fadnavis – छगन भुजबळांना देवेंद्र फडणवीस बळ देतात हे जनतेच्या लक्षात आले आहे, भुजबळांना तेवढ्यासाठीच मंत्रीपद दिले आहे का? असा सवाल मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी उपस्थित केला आहे. मराठ्यांचे 2-4 माकडं फडणवीस यांच्या बाजूने बोलतात. त्यामुळे समाजात नाराजी आहे. राज्यातील मराठा आता मुलांना न्याय देण्यासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. आम्ही आमच्या मुलांच्या न्यायासाठी का रस्त्यावर येऊ नये?,असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. जरांगे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना मी 4-5 दिवसांपूर्वी बोललो होतो. मुलींसाठी 100 टक्के शिक्षण केले होते. त्याची अंमलबजावणी केली असेल तर त्यांचे अभिनंदन. सगळ्यांच्या लेकींना त्यांच्यामुळे न्याय मिळाला त्याबद्दल सरकारचे कौतुक पण अॅडमिशन घेताना जी मुलींची फी घेतली ती परत करा, असेही ते म्हणाले. मंत्री म्हणतात हे आरक्षण टिकणार नाही म्हणजे आरक्षण हेच देणार आणि उडवणार हेच म्हणजे सगेसोयरे अंमलबजावणी हे देणार आणि आणखी उडवणार हे नक्की आहे. सरसकटच्या अध्यादेशाने यांचे फार पोट दुखते, सगे सोयरे अंमलबजावणी यांनीच द्यायची आणि टिकवायची जबाबदारी सुद्धा यांचीच राहील आमहाला गॅझेट सुद्धा लागू पाहिजे. मराठाच राज्यात किंग राहिला पाहिजे. पाडा म्हणण्यात खूप ताकद आहे. 2-3 टप्पे होऊ द्या मग बॉंबच फोडणार, असा गौप्यस्फोट मराठा आंदोलक जरांगेंनी केला आहे.