maratha reservation – मराठा आरक्षणासाठी (maratha reservation) उपोषण करणाऱ्या मनोज जरांगेंच्या (manoj jarange patil) उपोषणाचा आजचा पाचवा दिवस होता. गेल्या 25 ऑक्टोबरपासून त्यांचे आमरण उपोषण सुरू आहे. राज्यात जागो-जागी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही अंदोलकांच्या रोषाला समोरे जावं लागत आहे. यानंतर शिवसेनाप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी देखील सरकारला धारेवर धरले आहे.
आरक्षणासाठी मराठा समाजातील बांधव रोज आत्महत्या करत आहेत. समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार आहे काय? असा संतप्त सवाल केला आहे.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत आहे. सरकार त्यांच्या जीवाशी खेळण्याचे राजकारण करीत असेल तर महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेला ते चूड लावत आहेत.
मराठा समाज त्यांचा हक्क मागत आहे आणि त्यांना त्यांचा हक्क मिळायला हवा. ओबीसी, आदिवासीसह इतर समाजाच्या हक्कांना धक्का न लावता मराठा, धनगर, समाजाला त्यांचे हक्काचे टिकणारे आरक्षण मिळायला हवे.
जरांगे पाटील उपोषण करत आहेत पण आरक्षणासाठी लोक रोज आत्महत्या करत आहेत. समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार आहे काय?
सरकार मन की बात करत आहे. पण त्यांचे मन निर्दयी आहे. जरांगे पाटीलांचे प्राण वाचवण्याची त्यांची भूमिका दिसत नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
संजय राऊतांच्या नियोजित दौऱ्यात बदल !
दौंड दौऱ्यावर असणारे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना देखील मराठा अंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यामुळे, त्यांच्या नियोजित दौऱ्यात काही बदल करण्यात आला आहे.
राऊतांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र मराठा संघटनांच्या आक्रमक भूमिकेनंतर बाईक रॅली रद्द करण्यात आली. यावेळी मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊतांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.