Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलक मनोज जरांगे मागच्या पाच दिवसापासून (Manoj Jarange) उपोषणाला बसले आहेत. आरक्षणासाठी अंतरवाली सराटी याठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण 25 ऑक्टोबरपासून सुरू आहे. दरम्यान, आता त्यांच्या समर्थनार्थ आणि आरक्षणासाठी राज्यभरातून आंदोलनं करण्यात येत आहेत. राज्यात काही ठिकाणी मराठा समाज आक्रमक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. यानंतर राजकीय वतुर्ळातूनही यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील संतप्त झाले असून त्यांनी सरकारला धारेवर धरले आहे. आरक्षणासाठी मराठा समाजातील बांधव रोज आत्महत्या करत आहेत. समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार आहे काय? असा संतप्त सवाल केला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत आहे. सरकार त्यांच्या जीवाशी खेळण्याचे राजकारण करीत असेल तर महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेला ते चूड लावत आहेत. मराठा समाज त्यांचा हक्क मागत आहे आणि त्यांना त्यांचा हक्क मिळायला हवा.ओबीसी,आदिवासीसह इतर समाजाच्या हक्कांना धक्का न लावता मराठा, धनगर, समाजाला त्यांचे हक्काचे टिकणारे आरक्षण मिळायला हवे.अशी मागणी त्यांनी केली जरांगे पाटील उपोषण करत आहेत पण आरक्षणासाठी लोक रोज आत्महत्या करत आहेत. समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार आहे काय? सरकार मन की बात करत आहे. पण त्यांचे मन निर्दयी आहे. जरांगे पाटील यांचे प्राण वाचवण्याची त्यांची भूमिका दिसत नाही. असे