Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. मनोज जरांगे पाटील आपल्या मराठा बांधवांसह मुंबईत आल्यानंतर राज्य सरकारकडे आपल्या 13 मागण्या करतानाच निर्णायक इशारा दिला होता. मात्र, वाशीमधील गर्दी पाहून सरकारने एक पाऊल मागे घेत अखेर जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सरकारकडून नवा अध्यादेश तयार करून जरांगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर राज्यातील मराठा बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आजच्या या महत्वाच्या निर्णयावर राज्यातील अनेक मोठे नेते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. आता मराठी अभिनेते किरण माने यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून यावर भाष्य केलं आहे.
किरण माने यांची फेसबुक पोस्ट !
मराठा बांधवांनो, तहात हारू नका…. “सदर अध्यादेश 16 फेब्रूवारी 2024 पासून किंवा त्यानंतर लागू होईल.” आणि “…यामुळे बाधित व्यक्ती दरम्यानच्या काळात आपल्या हरकती, सूचना संबंधितांकडे नोंदवू शकतील, ज्या विचारत घेण्यात येतील.” हा तिढा लै लै लै महत्त्वाचा आहे. निव्वळ निवडणुकांसाठीचे हे गाजर आहे. जागे रहा…एक मराठा लाख मराठा !