Manoj Jarange Patil| लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मनोज जरांगे पाटील यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवार देणार नाही, अशी घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
अपक्ष उमेदवार उभे करण्यास मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी नकार दिला. मराठा समन्वयक गावोगावी गेले नाहीत. जे गेले त्यांनी चुकीची माहिती आणली. त्यामुळे अपक्ष उमेदवार उभे करणे शक्य नाही. तसे केल्यास उमेदवार निवडून येणार नाहीत, असे सांगत जरांगे यांनी सांगितले आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? Manoj Jarange Patil|
माझ्याकडे आलेल्या अहवालावरून मला उमेदवार देता येणार नाही. उमेदवार जाहीर करण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत काही जणांना पुढे करण्यासाठी कसरती झाल्या. चुकीचे अहवाल आले. त्यामुळे अपक्ष उमेदवार मी देणार नाही. पक्ष उमेदवार दिल्यास ते उमेदवार पडतील आणि आरक्षणाऐवजी राजकारण हाच केंद्रबिंदू ठरेल. त्यामुळे विधानसभा निवडणुकीची तयारी करा, असे जरांगे यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, “ज्याला पाडायचं त्याला पाडा. ज्याला निवडून द्यायचं त्याला द्या. जो सगे-सोयरे कायद्याला पाठिंबा देईल, त्याला मतदान करा बाकीच्यांना पाडासमाजाचे मतदार ठरवतील. आरक्षणाचा लढाच महत्त्वाचा आहे. घाईघाईत अपक्ष उमेदवार उभे करून राजकारणासाठी जात मातीमध्ये मिसळू देणार नाही.” Manoj Jarange Patil|
यावेळी जरांगे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी दौरे करणार असल्याचे सांगितले. “आणखी सहा महिने विधानसभा निवडणुकीसाठी बाकी असून, तोपर्यंत मागण्या मान्य करण्यासाठी सरकारजवळ वेळ आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आपण दौरे करणार आहोत. आपापल्या मतदारसंघात कोणत्या पक्षास मतदान करायचे याचा निर्णय मराठा समाजाचे मतदार ठरवतील. कोणावर रोष व्यक्त करायचा असेल, तर समाज त्याला पराभूत करेल,” अशी भूमिका जरांगे यांनी स्पष्ट केली.
हेही वाचा:
भाजप उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, प्रचारादरम्यान वाहनांची तोडफोड
उमेदवार बदलणार? कंगना राणावतला तिकीट दिल्यामुळे भाजप नेते ‘नाराज’