Manoj Jarange Patil । मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण मागे घेतले असून, त्यांनी उपचार देखील घेतले आहे. तर त्यांनी धरणे आणि साखळी उपोषण करण्याचे आवाहन मराठा समाजाला केले आहे. । Manoj Jarange Patil
अंबडमध्ये झालेल्या संचार बंदीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांना संचारबंदीमुळे लोकांना भेटणे शक्य नसले तरी ते आता महाराष्ट्रात फिरून स्वत: लोकांना भेटणार आहेत. त्यामुळे सध्या पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र दौरा सूर केला आहे.
मनाेज जरांगे हे आज धाराशिव आणि सोलापूरच्या दौर्यावर आहेत. या ठिकाणच्या विविध कार्यक्रमांना त्यांनी भेटी दिल्या असून यावेळी त्यांनी समाज माध्यमांशी देखील संवाद साधला आहे. ‘मी अंतरवालीतून बाहेर पडणार असून, माझ्यावर हल्ला होउ शकतो’, अशी भीती जरांगे यांनी व्यक्त केली.
यावेळी मनोज जरांगे म्हणाले की, ‘आमच्या मागे शरद पवार आहेत, असा दावा करणारे उपमुख्यमंत्री फडणवीस काल पुढे होऊन तुतारी वाजवायला गेले होते. त्यांना आता आमच्या भिंतीवर पोम्प्लेट चिटकवायला यायचं नाही का? असा सवालही त्यांनी केला. । Manoj Jarange Patil
माझ्यावरती हल्ला घडवून आणण्याचा डाव आहे. आता मी बाहेर चाललो आहे. भाजपच्या कार्यकर्त्याला सांगा मला अडवायला. फडणवीस यांचे कोणते कार्यकर्ते माझ्यावर हल्ला करतात तेही मला बघायचे आहेत, असेही ते म्हणाले.
मराठ्यांनी केसेसला तयार रहा. केस झाली की कोर्टात जामीन करुन घ्या. सर्व मराठा वकिलांची फौज तयार आहे. उद्यापासून पंतप्रधान पासून राष्ट्रपतीपर्यंत मराठ्यांवर अन्याय होत असल्याचे मेल पाठवायची मोहीम सुरु करा. । Manoj Jarange Patil
कोणत्याही नेत्यांनी आमच्या दारात यायचं नाही, असे पॉम्प्लेट दारावर चिटकवा. मराठ्यांच्या पोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तर अवघ्या तालुक्यातील मराठयांनी पोलीस ठाण्यात जाब विचारण्यासाठी जाऊन बसा, असे आवाहन त्यांनी केले.