manoj jarange । मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे अंतरवाली सराटीमध्ये आज प्रचंड आक्रमक झालेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत असून, त्यांना माझा बळी हवा आहे असा खळबळजनक आरोप जरांगे यांनी केला आहे. तसेच मी आता फडणवीसांच्या बंगल्यासमोर जाणार असून, माझा जीव घ्या असे म्हणत मनोज जरांगे थेट व्यासपीठावरून खाली उतरले आहे. दरम्यान, ते सध्या मुंबईतील सागर बंगल्याकडे रवाना झालेत.
आज अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी माध्यमांशी आणि समाजाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले, यावेळी त्यांनी “मला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा म्हणत जरांगे प्रचंड आक्रमक झाले आहे. जरांगे यांची आक्रमक भूमिका पाहता गावकऱ्यांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच जरांगे यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र जरांगे हे कोणाचेही न ऐकता मुंबईकडे रवाना झालेत.
पायी उपोषण करत आपण सागर बंगल्याकडे manoj jarange ।
दरम्यान, मनोज जरांगे यांनी पायी उपोषण करत आपण सागर बंगल्याकडे जात असून त्यांना माझा बळी घ्यायचा आहे. असे त्यांनी म्हटले. तसेच पायी निघाले असताना जरांगे यांची तब्बेत बिघडल्याचे माहिती समोर आलीय. या अगोदर मनोज जरांगे म्हणाले की, मराठ्यांचा राज्यावर पुन्हा एकदा दरारा निर्णय झाला आहे. हा दरारा संपवण्याचे त्यांचे स्वप्न आहे. विशेष म्हणजे हा दरारा मराठ्यांच्याच हाताने संपवण्याचे काम चालू आहे. यात एकनाथ शिंदे यांचे दोन-चार लोक आहेत. अजित पवार यांचेही दोन आमदार आहेत.असे त्यांनी म्हटलं.
हेही वाचा
“माझा बळी पाहिजे तर, मी सागर बंगल्यावर येतो”; मनोज जरांगे यांचे फडणवीसांना आव्हान
सलाईनमधून विष देण्याचा विचार केला जातोय manoj jarange ।
पुढे “सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली जात नाहीये. १० टक्के आरक्षण मराठ्यांवर लादले जात आहे. मनोज जरांगे ऐकत नाही म्हणून त्याला संपवण्याचा प्रयत्न केला जातोय. मनोज जरांगेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा मनोज जरांगेला उपोषणात मरु द्यावे, यासाठी प्रयत्न केला जातोय. मला सलाईनमधून विष देण्याचा विचार केला जातोय. त्यामुळेच मी परवा रात्रीपासून सलाईन बंद केले आहे. माझं एन्काउंटर करावं लागेल असं फडणवीस यांचं स्वप्न असल्याचे जरांगे यांनी म्हटले.