कोलकाता – नंदीग्रामप्रमाणेच आपल्या पारंपरिक भवानीपूर मतदारसंघात पराभव होऊ शकतो, याची कल्पना त्यांना आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या प. बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केली.त्यांच्या हक्काच्या मतदारसंघात त्यांना विजयाची खात्री असेल तर त्या एवढी धावपळ का कारत आहेत? असा सवाल त्यांनी आपल्या मुद्द्याच्या समर्थनार्थ केला.
ज्यावेळी ममता बॅनर्जी प्रथम सोमनाथ चॅटर्जी यांना पराभूत करून विजयी झाल्या त्यावेळी त्यांना कोणी ओळखत नव्हते. राजकारण असे घडू शकते याची कल्पनाही त्यावेळी कोणी केली नव्हती. भाजपा नेते सुवेंदु अधिकारी यांनी अलीकडेच ममता यांचा नंदिग्राममध्ये दोन हजार मतांनी पराभव केला होता, याकडे घोष यांनी लक्ष वेधले.
नंदीग्राममधून आपण विजयी होऊ अशा विश्वासाने ममता निवडणूक लढल्या पण त्या पराभूत झाल्या. प्रियांका टिब्रेवाल या निवडणुकोत्तर हिंसाचारातील न्यायासाठी लढत आहेत, त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आली. तृणमूल कॉंग्रेसचे सारे मंत्री मतदार संघातील कानाकोपरा पिंजून काढत आहेत. त्यावरून आपला पक्ष मागे पडत असल्याची जाणीव त्यांना झाली आहे, असे त्यांनी सांगितले.