नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर कॉंग्रेसने मोठे फेरबदल केले आहेत. यातील ठळक आणि प्रमुख बदल म्हणजे पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याकडे आता उत्तर प्रदेशची जबाबदारी नसणार आहे. ही जबाबदारी आता अविनाश पांडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
अर्थात पांडे यांना आता त्या राज्याचे प्रभारी करण्यात आले आहे. दुसरी महत्वाची घटना म्हणजे राजस्थानातील कॉंग्रेसचे आक्रमक नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्याकडे छत्तीसगढची जबाबदारी देण्यात आली आहे.
रमेश चेन्नीथला यांना महाराष्ट्राचे तर मोहन प्रकाश यांना बिहारचे प्रभारी करण्यात आले आहे. के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे तूर्त सरचिटणीस पदाची जबाबदारी ठेवण्यात आली आहे आणि प्रियंका गांधी यांच्याकडेही तूर्त कोणत्या राज्याचा कार्यभार देण्यात आलेला नाही. म्हणजे त्या कोणत्याही राज्याच्या प्रभारी आता नाहीत.