Mahua Moitra : हकालपट्टीच्या शिफारशीवरून खासदार महुआ मोईत्रा आक्रमक ; म्हणल्या,”आता महाभारताचे युद्ध होणार”

Mahua Moitra : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याचे आरोप करण्यात आले होते. याच आरोपासंदर्भात संसदेच्या एथिक्स कमिटीचा अहवाल अखेर आज लोकसभेत सादर करण्यात आला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी हा अहवाल सादर करण्यात आला आहे. एथिक्स कमिटीने अहवाल सादर केल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेत गोंधळ घातला आणि घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभेचे कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. दरम्यान, अहवाल सादर झाल्यानंतर महुआ मोईत्रा चांगल्याच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
महुआ मोईत्रा यांनी एथिक्स कमिटीचा अहवाल सादर झाल्यानंतर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी, “माँ दुर्गा आली आहे, आता बघू… अहवाल सादर करण्यापूर्वी महुआ मोईत्रा यांनी महाभारतासारखे युद्ध करण्याचा इशारा दिला आहे.” बंगाली कवितेचे पठण करताना त्यांनी, धमकी देणाऱ्यांविरुद्ध ताठ मानेने लढले पाहिजे. त्यानंतर दिनकर यांच्या सुप्रसिद्ध कवितेचे पठण करताना त्यांनी,“जेव्हा मनुष्य नाश होण्याच्या वाटेवर असतो, तेव्हा सर्वात आधी त्याचा विवेक मरतो. त्यांनी (भाजपा) वस्त्रहरण करण्यास सुरुवात केली, आता पुढे तुम्ही महाभारताचे युद्ध पाहाल.” असे म्हटले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अहवाल सादर केल्यानंतर समितीच्या शिफारशीच्या आधारे महुआ मोईत्रा यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्याचा प्रस्तावही आणला जाणार आहे. यावेळी, विरोधक अहवालावर मतांचे विभाजन करण्याची मागणी करू शकतात, म्हणून भाजपने त्यांच्या खासदारांना आज सभागृहात राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी हा अहवाल ४ डिसेंबरला संसदेत मांडण्यात येणार होता, मात्र तो झाला नाही.
9 नोव्हेंबर रोजी, नीतिशास्त्र समितीने सहा-चार बहुमताने महुआला पैसे घेतल्याच्या आणि प्रश्न विचारल्याच्या आरोपावरून लोकसभेतून बाहेर काढण्याची शिफारस करणारा अहवाल स्वीकारला होता. याची अंमलबजावणी झाल्यास महुआचे संसद सदस्यत्व संपुष्टात येऊ शकते.




