Weather Update : राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडी प्रचंड वाढली असून, बोचरी थंडी सहन करण्याजोगी झाली आहे. यामुळे ठिकठिकाणी शेकोटी पेटवल्या जात आहेत. यामुळे काही प्रमाणात थंडीपासून उसंत मिळत असली तरी थंडीने हुडहुडी भरली हे नाकारून चालणार नाही. हेच हुडहुडी आणखी वाढणार आहे. हवामान विभागाने तसा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडी का वाढत आहे? याचे कारणही समोर आले आहे. उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे वाहणारे गार वारे वेगाने वाहू लागले आहेत, अशातच यामध्ये आणखी वाढ झाली आहे, परिणामी थंडी देखील वाढत चालली आहे. थंडीमुळे राज्यातील अनेक महत्वाच्या शहरांमधील तापमान १० अंश सेल्सिअसच्या आसपास किंवा मग त्याखाली नोंदवले गेले आहे. चिंतेचा विषय म्हणजे अहिल्यानगरमध्ये ६.६ इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यात ७.९ इतके अंश तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात थंडीचा कडाका पुढील काही दिवस कायम राहणार आहे. दोन दिवसांत राज्यात थंडीची लाट पसरल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे थंडीपासून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कुठे किती तापमान? अहिल्यानगर: ६.६ पुणे: ७.९ जळगाव: ७.० कोल्हापूर १४.७ महाबळेश्वर: ११.१ मालेगाव: ८.८ नाशिक: ८.२ सांगली १२.३ सातारा १०.० अकोला १०.० अमरावती १०.२ बुलढाणा १२.२ यवतमाळ १० सोलापूर: १३.२ छत्रपती संभाजीनगर: १०.८ परभणी: १०.४ गोंदिया: ८.० नागपूर: ८.१ वर्धा: ९.९ पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीची लाट कायम राहणार असून, हवामान विभागाने काही शहरांना थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे. तसेच काही जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढणार असल्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे लहान मुले, वयस्कर व्यक्तींनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. या जिल्ह्यात थंडी कायम राहणार अहमदनगर, सोलापूर, पुणे, धुळे, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांत थंडी वाढण्याची शक्यता नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया, वर्धा आणि नागपूर हेही वाचा : Pune News : 8 तासांच्या अथक प्रयत्नानंतर विमानतळ परिसरातील बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश