मुंबई: लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली असून राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे. तसेच निवडणुकीच्या मैदानात मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार ट्विटर युद्ध रंगले आहे. भाजपने #विसरलानाहीमहाराष्ट्र असा हॅशटॅग देत काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना झालेल्या चुकांवरून त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, मावळ गोळीबार प्रकरणावरून भाजपने अजित पवारांना लक्ष केले आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री असताना ९ ऑगस्ट २०११ ला मावळमध्ये आंदोलन करणाऱ्या तीन शेतकऱ्यांना पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले, कित्येक शेतकरी गोळीबारात जखमी झाले! हे महाराष्ट विसरला नाही, असे भाजपने म्हटले आहे. तसेच शेतकऱ्यांवर अमानुष गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले होते ?, असा प्रश्न देखील भाजपने उपस्थित केला आहे.
मावळ गोळीबार
अजित पवार उपमुख्यमंत्री असताना ९ ऑगस्ट २०११ ला मावळमध्ये आंदोलन करणाऱ्या तीन शेतकऱ्यांना पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले, कित्येक शेतकरी गोळीबारात जखमी झाले!#विसरला_नाही_महाराष्ट्र#आघाडी_बिघाडी@NCPspeaks@AjitPawarSpeaks pic.twitter.com/T5XJmzynx0— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 1, 2019