Maharashtra Fuel Crisis : राज्यात इंधन टंचाईच्या चर्चांदरम्यान अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या एका विधानाने नागरिकांची चिंता वाढली आहे. “राज्यात सध्या महिनाभर पुरेल इतकाच इंधनसाठा उपलब्ध आहे,” असे भुजबळ यांनी म्हटल्याने पेट्रोल-डिझेल पुरवठ्याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. (Maharashtra Fuel Crisis) गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम आशियातील तणावाचा परिणाम जागतिक इंधन बाजारावर होत आहे. विशेषतः अमेरिका-इराण चर्चेत प्रगती न झाल्याने होर्मुझ सामुद्रधुनीतील परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे. याचा परिणाम कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि एलपीजीच्या दरांवर झाला असून आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी वाढ झाली आहे. (Maharashtra Fuel Crisis) राज्यात इंधन तुटवड्याची स्थिती महाराष्ट्रातील अनेक भागांत पेट्रोल आणि डिझेल पुरवठा विस्कळीत झाल्याचे चित्र दिसत आहे. काही पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून अनेक ठिकाणी ‘नो स्टॉक’चे फलक झळकत आहेत. इंधनासाठी नागरिकांमध्ये वाद आणि हाणामारीच्या घटनाही घडत असल्याची माहिती समोर आली आहे. हिंगोली जिल्ह्यात संतप्त शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावर ठिय्या आंदोलन केल्याचे समोर आले, तर जालना परभणी आणि नांदेड जिल्ह्यांतील अनेक पंपांवर डिझेलचा साठा संपल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. (Maharashtra Fuel Crisis) सरकार काय म्हणतं? दरम्यान, पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी देशात तेल किंवा गॅसची कमतरता नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र काही भागांत पुरवठा व्यवस्थेमध्ये अडथळे येत असल्याने तात्पुरता तुटवडा जाणवत असल्याचे सांगितले जात आहे. (Maharashtra Fuel Crisis) छगन भुजबळ यांनीही “पेट्रोल-डिझेल मिळत नाही, अशा स्वरूपाच्या अधिकृत तक्रारी अद्याप आलेल्या नाहीत. काही ठिकाणी पुरवठा पोहोचण्यास उशीर होत असू शकतो. मात्र तक्रारी आल्यास तातडीने कारवाई केली जाईल,” असे म्हटले आहे. (Maharashtra Fuel Crisis) इंधन दरवाढीने सर्वसामान्यांना फटका दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली असून इंधनाच्या किंमतीत सुमारे 90 पैशांची वाढ झाल्याने महागाईचा भार सर्वसामान्यांवर पडत आहे. वाढते इंधनदर आणि संभाव्य तुटवड्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (Maharashtra Fuel Crisis)