Maharashtra Budget 2026 – निवडणुकीवेळी ज्या थापा मारल्या, त्या क्लिप अजूनही माझ्याकडे आहेत. आम्ही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती 2 लाखांपर्यंत केली होती. एकूणच आजचा अर्थसंकल्प पाहिले तर सातबार कोरा नाही झाला. कर्ज काढून फटाके फोडल्यासारखे हा अर्थसंकल्प आहे, विकासाचे मृगजळ दाखवणारा आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे म्हणाले, शेतकरी कर्जमाफी म्हणजे लबाडाघरचे निमंत्रण आहे. मुख्यमंत्री म्हणत होते, की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार. त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याचे दिसत नाही. आम्ही 5 वर्षांपुर्वी कालबद्ध पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. त्यावेळी अटीशर्थीं, पात्र-अपात्र असे कोणतेही जंजाळ ठेवले नव्हते. maharashtra health budget 2026 शेतकऱ्यांसाठी हा फसवा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामुळे कोणाच्या आयुष्यामध्ये काहीही फरक पडलेला नाही. लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिलेले नाही. या अर्थसंकल्पात थापांचे थर वाढले असून शाब्दीक खेळ केला गेला आहे. आताची कर्जमुक्ती 2047 पर्यंत पूर्ण करणार का? पण, 2047 कोणी बघितला आहे? आता शेतकऱ्यांच्या हातात काय पडले?, असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला. मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा : १ – ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान. २ – दिवंगत अर्थमंत्री अजित पवार यांचे भव्य स्मारक उभारणार आणि त्यांच्या नावाने नागरी पुरस्कार सुरू करणार. ३ – ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अखंडित सुरू राहणार. अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद. ४ – राज्यात १,२०० किमी मेट्रो मार्ग आणि ६,००० किमी द्रुतगती मार्ग विकसित करणार. मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेनसाठी तरतूद. ५ – नवीन गुंतवणूक धोरणातून ५० लाख प्रत्यक्ष रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट. गडचिरोली नवे ‘स्टील हब’ होणार. ६ – मुंबईत ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ आणि राज्यात २९५ हून अधिक गेमिंग स्टुडिओ उभारणार. ७ – सातारा वासोटा किल्ल्यावर रोप-वे आणि नागपूर (रामटेक) येथे तिसरी चित्रसृष्टी उभारणार. ८ – ‘गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत’ आता शेतमजुरांचाही समावेश; नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात.