कोल्हापूर – अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. वरिष्ठ दिवाणी न्यायालयात पुजाऱ्यांच्या कारभारात हस्तक्षेप करू नये असा पुजाऱ्यांच्या बाजूने निकाल आल्याने पुजारी हटाव संघर्ष समिती पुन्हा आक्रमक झालीय. या निर्णयाचा आधार घेऊन जर वादग्रस्त पुजारी मंदिरात जाण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना रोखले जाईल असा इशारा कृती समितीने दिलाय.
राज्यपालांच्या सहीने कायदा झाला असताना पुन्हा न्यायालयात जाण्याचे पुजाऱ्यांचे धाडस हे वादग्रस्त पुजाऱ्यांचे षड्यंत्र असून ते हाणून पाडण्याचा इशारा संघर्ष समितीने दिलाय. आज याबाबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला जाब विचारण्यासाठी संघर्ष समितीचे पादाधिकारी गेले होते मात्र वरिष्ठ अधिकारी नसल्याने त्यांना माघारी फिरावे लागले मात्र हे आंदोलन आता पुन्हा तीव्र करण्याचा इशारा कृती समितीने या निमित्ताने दिलाय.