Arvind Kejriwal | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगात आहे. मात्र त्यांच्या प्रकृतीशी संबंधित माहिती समोर आली आहे. तिहार तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगात केजरीवाल यांचे वजन वाढले असून ते पूर्णपणे निरोगी आहेत.
अरविंद केजरीवाल एक severe diabetic हैं। स्वास्थ की समस्याओं के बावजूद, वे देश की सेवा में 24 घण्टे लगे रहते थे।
गिरफ़्तारी के बाद से अब तक, अरविंद केजरीवाल का वज़न 4.5 किलो घट गया है। यह बहुत चिंताजनक है। आज भाजपा उन्हें जेल में डाल कर उनके स्वास्थ को ख़तरे में डाल रही है।
अगर…
— Atishi (@AtishiAAP) April 3, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाचे विरोधी पक्षनेते रामवीर सिंह बिधुरी यांनी केजरीवाल यांचे वाढले असल्याचे म्हटले आहे. तसेच केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेची पातळी आणि रक्तदाबही सामान्य असल्याचा दावा बिधुरी यांनी केला आहे. ”अटक झाल्यानंतर चार दिवसांत अरविंद केजरीवाल यांचे वजन ४.५ किलोने कमी झाल्याचे आदमी पक्षाने म्हटले आहे. मात्र, अधिकृत माहितीनुसार, त्यांचे वजन कमी झाले नसून उलट १ किलोनी वाढले आहे”, असे ते म्हणाले.
तुरुंगात साखरेची पातळी बिघडत असल्याचा दावा ‘आप’ने केला होता
तिहार तुरुंगात अरविंद केजरीवाल यांची साखरेची पातळी खालावली असल्याचा दावा आप पक्षाने केला आहे. उपवास रक्तातील साखर 160 आहे असे आप पक्षाकडून सांगण्यात आले होते.
तत्पूर्वी, आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी अरविंद केजरीवाल यांचे वजन ४.५ किलोनी घटल्याचा दावा केला होता. अरविंद केजरीवाल यांना मधुमेहाचा गंभीर आजार आहे. आरोग्याच्या समस्या असतानाही ते 24 तास देशाच्या सेवेत तत्पर राहिले. अटक झाल्यापासून अरविंद केजरीवाल यांचे वजन 4.5 किलोने कमी झाले आहे. हे खूप चिंताजनक आहे. आज त्यांना तुरुंगात टाकून भाजप त्यांचे आरोग्य धोक्यात आणत आहे. अरविंद केजरीवाल यांना काही झाले तर संपूर्ण देशाचा उल्लेख नाही, देवही त्यांना माफ करणार नाही.
हे वाचलं का ? अमेठी-रायबरेलीतून कोण निवडणूक लढवणार? ए के अँटोनी यांनी दिले हे ‘संकेत’