Rahul Gandhi | PM Modi – अनेक विरोधी पक्षनेते प्रतिभावान आणि चांगले वक्ते आहेत, परंतु राहुल गांधींमुळे त्यांना बोलण्याची संधी मिळत नाही. काँग्रेस पक्ष गोंधळ घालतो कारण विरोधी पक्षात काही नेते आहेत जे राहुल गांधींपेक्षा चांगले बोलतात आणि त्यांना हे नको आहे अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी व कॉंग्रेस पक्षाला लक्ष्य केले. पंतप्रधानांनी ही टिप्पणी एका चहा पार्टी दरम्यान केली, ज्यामध्ये कोणताही विरोधी खासदार सहभागी झाला नव्हता आणि फक्त एनडीएचेच नेते उपस्थित होते. पंतप्रधान पुढे म्हणाले की, विरोधी पक्षाचे खासदार संसदेच्या कामकाजात गोंधळ निर्माण करण्यास मजबूर आहेत कारण ते राहुल गांधींपेक्षा चांगले वक्ते आहेत, परंतु लोकसभेतील विरोधी पक्षनेते त्यांना प्रोत्साहन देऊ इच्छित नाहीत. संसदेचे कामकाज विरोधी पक्षाच्या खासदारांनी नियमितपणे विस्कळीत केले आहे. लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झाल्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी चहा पार्टीचे आयोजन केले होते. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्र्यांसह एनडीए नेते चहापानाला उपस्थित होते परंतु विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह एकही विरोधी पक्ष खासदार उपस्थित नव्हता. गुरुवारी लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. पावसाळी अधिवेशनात कामकाजात गतिरोध कायम ठेवल्याबद्दल लोकसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षांबद्दल नाराजी व्यक्त केली आणि सांगितले की नियोजनबद्ध पद्धतीने सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणण्यात आला जो लोकशाही आणि सभागृहाच्या प्रतिष्ठेला अनुसरून नाही. अठराव्या लोकसभेचे पाचवे अधिवेशन २१ जुलै रोजी सुरू झाले ज्यामध्ये १४ सरकारी विधेयके सादर करण्यात आली आणि १२ विधेयके मंजूर करण्यात आली.