Mohan Bhagwat – जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला समजून घ्यायचे असेल तर प्रत्यक्ष संघात येणे गरजेचे आहे. संघाला फक्त एक सेवा संघटना मानणे ही एक मोठी चूक असेल. बरेच लोक भाजपच्या दृष्टिकोनातून संघ समजून घेण्याचा प्रयत्न करतात, जे पूर्णपणे चुकीचे आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे भागवत एका संमेलनात बोलत होते. भागवत म्हणाले की संघाचे अनेक कार्यकर्ते राजकीय पक्षांमध्ये काम करतात. परंतु संघ ही एक राजकीय संघटना आहे असा निष्कर्ष पूर्णपणे चुकीचा आहे. संघाचे कोणतेही शत्रू नाहीत, परंतु ज्यांचे स्वार्थ प्रभावित होतात तेच संघाला विरोध करतात आणि खोटेपणा पसरवतात. आमचा प्रयत्न असा आहे की, संघाबद्दलची मते तथ्यांवर आधारित असतील, भलत्याच व्यक्तींनी पसरवलेल्या खोट्या कथनांवर नाही. संघाची स्थापना भारताचे गौरव करण्याचे आणि जागतिक नेता बनण्याचे स्वप्न घेऊन झाली होती. ती राजकीय उद्दिष्ट किंवा प्रतिक्रिया म्हणून स्थापन झाली नव्हती. संघाचा जन्म हिंदू समाज संघटित करण्यासाठी झाला होता. डॉ. हेडगेवार यांनी प्रश्न उपस्थित केला: कुशल योद्धा आणि बुद्धिमान समाज असूनही ब्रिटीशांनी आपल्यावर राज्य कसे केले? १८५७ च्या क्रांतीच्या अपयशामुळे हे चिंतन करायला भाग पाडले, असेही भागवत शेवटी म्हणाले. हिंदूची व्याख्या आणि भारत : भागवत म्हणाले की हिंदू धर्म हा धर्म किंवा पंथ नाही तर एक व्यक्तिमत्व आहे. भारतातील जो कोणी या संस्कृती आणि मातृभूमीवर विश्वास ठेवतो तो हिंदू आहे. हिंदू सर्वसमावेशक आहेत आणि सर्वांच्या कल्याणावर विश्वास ठेवतात. आपली विविधता या एकतेतून निर्माण झाली आहे. शास्त्रज्ञांचा असाही विश्वास आहे की इंडो-इराणी प्लेटवर राहणाऱ्या लोकांचा डीएनए ४०,००० वर्षांपासून सारखाच आहे.