Year Ender 2025 Most impressive comeback : भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवणे हे कोणत्याही खेळाडूसाठी सोपे नसते. दरवर्षी अनेक तरुण खेळाडू संघात येतात, तर अनेक दिग्गजांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो. मात्र, २०२५ हे वर्ष अशा काही खेळाडूंसाठी अत्यंत खास ठरले, ज्यांनी प्रदीर्घ काळानंतर भारतीय संघात पुनरागमन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. करुण नायर: ८ वर्षांची प्रतीक्षा संपली २०२५ हे वर्ष फलंदाज करुण नायर कधीही विसरू शकणार नाही. तब्बल ८ वर्षे म्हणजेच जवळपास २९०० दिवसांनंतर त्याचे भारतीय संघात पुनरागमन झाले. इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी त्याला संघात स्थान देण्यात आले होते. नायरने पुनरागमन केले असले तरी, या दौऱ्यावर तो आपल्या बॅटने फारसा प्रभाव पाडू शकला नाही. श्रेयस अय्यर: चॅम्पियन्स ट्रॉफीचा हिरो २०२४ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खराब फॉर्ममुळे श्रेयस अय्यरला संघातून वगळण्यात आले होते. मात्र, त्याने खचून न जाता आपल्या खेळावर मेहनत घेतली. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याने शानदार पुनरागमन केले आणि या स्पर्धेत धावांचा पाऊस पाडून आपण संघासाठी किती महत्त्वाचे आहोत हे सिद्ध केले. हेही वाचा – Boxing Day Test : बॉक्सिंग डे टेस्ट म्हणजे काय? ही कसोटी कधी आणि का खेळली जाते? जाणून घ्या इतिहास इशान किशन: शिस्तीचा धडा आणि दमदार कामगिरी २०२३ मध्ये शिस्तभंगाच्या कारणास्तव इशान किशनला संघातून आणि बीसीसीआयच्या करारातून बाहेर काढले होते. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने आपली ताकद दाखवून दिली. ‘सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी’मध्ये ५१७ धावा फटकावून त्याने निवडकर्त्यांचे लक्ष वेधले. त्याच्या या मेहनतीचे फळ म्हणून त्याची आगामी टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय संघात निवड झाली आहे. मोहम्मद शमी: दुखापतीवर मात करून पुनरागमन २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर मोहम्मद शमी दुखापतीमुळे दीर्घकाळ मैदानाबाहेर होता. मात्र, २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी त्याने पूर्ण तंदुरुस्त होऊन संघात पुनरागमन केले. या महत्त्वाच्या स्पर्धेत त्याने आपल्या धारदार गोलंदाजीने पुन्हा एकदा भारतीय आक्रमणाचे नेतृत्व केले. हेही वाचा – Ravi Shastri : अॅशेस मालिकेतील पराभवानंतर ‘बॅझबॉल’चा अंत जवळ; रवी शास्त्री होणार इंग्लंडचे नवे कोच? शुबमन गिल: टी-२० संघात चढ-उतार शुबमन गिल बराच काळ भारतीय टी-२० संघापासून दूर होता. आशिया चषक २०२५ पूर्वी त्याची संघात उपकर्णधार म्हणून निवड झाली. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत तो खेळला, पण दुर्दैवाने खराब फॉर्ममुळे त्याला टी-२० विश्वचषक २०२६ च्या संघातून पुन्हा बाहेर व्हावे लागले.