BJP’s criticism of Thackeray brothers : मुंबईला महाराष्ट्रपासून वेगळे करण्याचा डाव सत्ताधाऱ्यांचा आहे, असा मोठा दावा ठाकरे बंधू करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपवर टीकेचे बाण सोडले जात आहेत. या टीकेला भाजपकडून देखील जशास तसे उत्तर दिले जात आहे. आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अवघे पाच दिवस शिल्लक असताना राजकारण चांगलेच तापले आहे. मराठीच्या मुद्यावर ठाकरे बंधूंनी भाजपवर सडकून टीका केली होती. याच मुद्यावरून आता भाजपने ठाकरे बंधूंना लक्ष्य करत जोरदार हल्लाबोल केला आहे. अवघे पाचच दिवस निवडणुकीला शिल्लक राहिल्याने टोकाची टीका केली जात आहे. मुंबईसाठी भाजप शिवसेना शिंदे यांना टफ फाईट देण्यासाठी ठाकरे बंधूंकडून जोरदार प्रयत्न केले जात असले तरी त्याला कितपत यश मिळणार हे १६ जानेवारीलाच कळणार आहे. मराठीच्या मुद्यावर भाजपने थेट सवाल करत मुंबईत मराठी टिकवण्यात ठाकरेंचा काय सहभाग? असे म्हणत चार प्रश्न विचारले आहेत. मराठी माणसांचे उध्दारकर्ते असल्याचं दावा करणारे ठाकरे बंधू आता एकत्र आहेत तर, चला… मुद्देसूद प्रश्न विचारू ! १ – १९९६ मध्ये राज ठाकरे यांनी शिवउद्योग सेना काढली. त्यासाठी मायकल जॅक्सनला आणलं, कोट्यावधीचा निधी गोळा केला गेला. यातून किती मराठी उद्योगपती गेल्या ३० वर्षात उभे राहिले? २ – उध्दव ठाकरे यांनी शिववडा सुरू केला. दादरला मोठी स्पर्धा घेतली… किती उद्योजक यातून उभे राहिले ? ३ – मुंबईत मराठी शाळांची संख्या कमी होत असताना त्या वाचविण्याचा काय केले? ४ – मराठी माणसाला नव्या जमान्यातील तंत्रकुशल नोकऱ्या मिळाव्या यासाठी काय केले? असे सवाल केले आहेत. मुंबईत मराठी टिकवण्यात ठाकरेंचा काय सहभाग? मराठी माणसांचे उध्दारकर्ते असल्याचं दावा करणारे ठाकरे बंधू आता एकत्र आहेत तर, चला… मुद्देसूद प्रश्न विचारू ! १ – १९९६ मध्ये राज ठाकरे यांनी शिवउद्योग सेना काढली. त्यासाठी मायकल जॅक्सनला आणलं, कोट्यावधीचा निधी गोळा केला गेला. यातून… — Keshav Upadhye (@keshavupadhye) January 11, 2026 असे कितीही प्रश्न विचारले तरी उत्तरांची नकारघंटा वाजेल. मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होण्यास ठाकरेच जबाबदार हे वास्तव मुंबईकरांनी अनुभवलेले आहे! असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. यामुळे या टीकेला आणि आरोपाला ठाकरे बंधू काय प्रत्युत्तर देणार याकडे लक्ष असणार आहे. हेही वाचा : जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा लांबणीवर? सुप्रिम कोर्टातून आली मोठी अपडेट