Mohammad Kaif on Suryakumar Yadav : पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार शुभमन गिल यांचा खराब फॉर्म चिंतेचा विषय बनला आहे. विश्वचषकापूर्वी भारताकडे फक्त आठ टी-२० सामने शिल्लक असल्याने, या दोन्ही महत्त्वाच्या फलंदाजांनी लवकरात लवकर सूर गवसणे आवश्यक आहे. भारताचे माजी फलंदाज मोहम्मद कैफ यांचे मत आहे की, गिलच्या तुलनेत सूर्यकुमार यादवचा फॉर्म भारतासाठी अधिक तणावपूर्ण आहे. कैफ यांनी स्पष्ट केले की, गिलच्या जागी दुसरा सलामीवीर संघात येऊ शकतो, पण कर्णधार असल्याने सूर्यकुमारला बदलणे शक्य नाही. विशेष म्हणजे, कर्णधारपद स्वीकारल्यापासून सूर्यकुमार यादव बॅटने विशेष कामगिरी करू शकलेला नाही. कैफ यांनी व्यक्त केली चिंता – मोहम्मद कैफ यांनी रविवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत लिहिले, “टी-२० विश्वचषक जवळ आहे. अशा परिस्थितीत गिलच्या तुलनेत सूर्यकुमारचा फॉर्म भारतासाठी अधिक चिंतेची बाब आहे. भारताकडे सलामीवीरांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, पण कर्णधाराला बदलले जाऊ शकत नाही.” हेही वाचा – Yashasvi Jaiswal Century : यशस्वीचा ‘धूम’ धमाका! ४८ चेंडूंत शतक ठोकत मुंबईला हरियाणाविरुद्ध मिळवून दिला विजय कैफ यांच्या या पोस्टवर क्रिकेट चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पूर आला आहे. एका वापरकर्त्याने टिप्पणी केली की, “कैफ भाई, अगदी बरोबर. मधल्या फळीत सूर्यकुमार हे इंजिन आहे आणि आम्ही तिथे गडबड करणे परवडणार नाही. सलामीवीरांसाठी बॅकअप आहे, पण विश्वचषकात पुढे जाण्यासाठी कर्णधाराचा फॉर्म महत्त्वाचा आहे.” कर्णधाराच्या कामगिरीचा आलेख २०२५ मध्ये सूर्यकुमारने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आतापर्यंत आठ वेळा एकेरी धावसंख्येवर बाद झाला आहे, तर शुबमन गिल पाच वेळा एकेरी धावसंख्येवर बाद झाला आहे. कर्णधार असल्यामुळे खराब फॉर्म असूनही सूर्यकुमारला विश्वचषकापर्यंत काही प्रमाणात सुरक्षा मिळण्याची शक्यता आहे. हेही वाचा – Tilak Varma Girlfriend : ‘ही’ सुंदर महिला क्रिकेटपटू आहे तिलक वर्माची गर्लफ्रेंड? व्हायरल फोटोंमुळे चर्चेला उधाण मात्र, शुबमन गिलला ही सूट मिळणे कठीण आहे, कारण आशिया चषकापूर्वी तो सलामी देण्यासाठी मूळ पर्याय नव्हता. संघात त्याची पुनरागमन अनावश्यकपणे संतुलित संयोजनात केलेली ढवळाढवळ वाटत आहे. गिलला निवड समितीचा निर्णय योग्य सिद्ध करण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी करावी लागेल. विशेषतः, इंग्लंडविरुद्धच्या खराब मालिकेमुळे संजू सॅमसनला बाहेर ठेवण्याचा निर्णय अजूनही प्रश्नचिन्हात आहे.