Bharat Gogawale : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ याजनेच्या श्रेयवादामुळे राजकारण तापले आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षांचे प्रमुख या निवडणुकीत सातत्याने लाडकी बहीण योजनेबाबत सांगत असून श्रेय घेतले जात आहे. यामुळे लाडकी नक्की कुणाची असा प्रश्न निर्माण झाला असतानाच आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते मंत्री भरत गोगावले यांनी एक मोठं विधान केले आहे. “लाडकी बहीण योजनेचे श्रेय फक्त एकनाथ शिंदेंनाच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी त्याचं श्रेय घेऊ नये. लाडक्या बहिणींनाही हे सर्व माहित आहे,” असे मोठं वक्तव्य भरत गोगावले यांनी केले आहे. यामुळे राजकारण आणखी तापणार असून, भाजप आणि राष्ट्रवादीकडून गोगावले यांच्या विधानावर काय प्रत्युत्तर येते हे पाहावे लागणार आहे. पुण्यातील जाहीर सभेत बोलताना भरत गोगावले यांनी हे विधान केले आहे. नेमकं काय म्हणाले भरत गोगावले? “मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग यांच्याशी बोलून मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणीचा विषय समजून घेतला. एकनाथ शिंदे स्वतः मध्य प्रदेश मध्ये गेले होते. त्यामुळे श्रेय कोणी घेऊ नये. अजित पवार हे एवढ्या वर्षे सत्तेत होते. देवेंद्र फडणवीस ही पाच वर्ष सत्तेत होते. त्यांनी लाडक्या बहिणींसाठी योजना का राबवली नाही.” असा सवाल भरत गोगावले यांनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले, लाडक्या बहिणींना लाडकी बहीण हे श्रेय एकनाथ शिंदें यांचं आहे. जो मुख्यमंत्री असतो तो योजना राबवत असतो. अजित दादांनी श्रेय घेऊ नये. लाडक्या बहिणींना ही माहिती आहे, असेही ते म्हणाले आहेत. प्रचारतोफा थंडावणार राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला निकाल लागणार आहे. आज १३ जानेवारीला प्रचारतोफा थंडावणार आहेत. राज्य निवडणूक आगोयाकडून निवडणुकीसाठी तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला निवडणुकीच्या गाजावाजा आता संपणार आहे. हेही वाचा : महापालिका निवडणूक प्रचाराचा आज समारोप, मी काही अदानींचा वकील नाही पण…आणि पीएमओचा पत्ता बदलला, अशा टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर