Ravi Shastri warn to Gautam Gambhir for Virat Rohit : भारतीय संघाचे दोन दिग्गज फलंदाज विराट-रोहित यांनी वनडे फॉरमॅटमध्ये आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. विशेषतः विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत सलग दोन शतके झळकावून आपला जबरदस्त फॉर्म दाखवला आहे. या पार्श्वभूमीवर, माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे एक मोठं विधान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रवी शास्त्रींनी दिला स्पष्ट इशारा – रवी शास्त्रींनी एका पॉडकास्टमध्ये विराट-रोहितला त्रास देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. ते म्हणाले, “विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दादा आहेत. हे दोघेही व्हाईट बॉल क्रिकेटमधील खूप मोठे खेळाडू आहेत. तुम्ही या उंचीच्या खेळाडूंशी पंगा घेऊ शकत नाही. काही लोक त्यांच्याशी पंगा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जर या दोघांनी ठरवलं आणि त्यांनी अॅक्शन घेतली, तर जो कोणी त्यांच्याशी पंगा घेत आहे, ते बाजूला होतील.” रोहित आणि विराट २०२७ चा वर्ल्ड कप खेळू शकतील का, असा प्रश्न विचारला असता शास्त्रींनी ‘हो’ असे उत्तर दिले. ते म्हणाले, “अनुभव बाजारात विकत मिळत नाही आणि या दोघांकडे तो अनुभव आहे. त्यामुळे रोहित आणि विराट दोघेही २०२७ च्या वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसू शकतात.” हेही वाचा – Mitchell Starc Record : मिचेल स्टार्कचा वर्ल्ड रेकॉर्ड! वसीम अक्रमला मागे टाकत रचला नवा इतिहास रोहित-विराटला कोण त्रास देत आहे? याबद्दल कोणतीही ठोस बातमी नसली तरी, सध्या हेड कोच गौतम गंभीर आणि रोहित-विराट यांच्यात संबंध ठीक नसल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल होत असलेल्या चर्चांनुसार, रोहित आणि विराट हे दोघेही गंभीर यांच्याशी नीट बोलत नाहीत आणि प्रॅक्टिस सेशनमध्येही ते कोचपासून दूर राहताना दिसतात. हेही वाचा – IND vs SA : ‘कोहलीमुळेच जमले!’ पहिल्या वनडे शतकानंतर ऋतुराज गायकवाडने सांगितला संपूर्ण ‘स्ट्राइक रोटेशन’चा प्लान तरीही या सगळ्या गोष्टींची पर्वा न करता दोन्ही खेळाडू मैदानात धावांचा डोंगर उभारत आहेत. विशेष म्हणजे, या दोघांनीही आता विजय हजारे ट्रॉफी मध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विराट कोहली दिल्लीसाठी विजय हजारे ट्रॉफीत तीन सामने खेळू शकतो, तर रोहित शर्माने विजय हजारेसह सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मध्येही खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.