IIND vs SA Clean Sweep : भारतीय १९ वर्षांखालील (U-19) क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत निर्भेळ यश संपादन केले आहे. बेनोनी येथील विलोमूर पार्कवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत भारताने मालिका ३-० अशी खिशात घातली. विशेष म्हणजे, वैभव सूर्यवंशीने कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारताचा धावांचा डोंगर: वैभव आणि एरॉनची शतकी आतिशबाजी – नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत ७ गडी गमावून ३९३ धावांचा विशाल डोंगर उभा केला. सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि एरॉन जॉर्ज यांनी मैदानात चौफेर फटकेबाजी करत शानदार शतके झळकावली. वैभव सूर्यवंशी: १२७ धावांची आक्रमक कप्तानी खेळी. एरॉन जॉर्ज: ११८ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान. या दोघांशिवाय वेदांत त्रिवेदीने ३४ धावा आणि मोहम्मद एनांने २८ धावांची उपयुक्त खेळी केली, ज्यामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली. हेही वाचा – Ridhima Pathak Quits : राष्ट्रहित पहिले! रिद्धिमा पाठकने ‘BPL’ची सोडली साथ, भारत-बांगलादेश तणावात मोठा निर्णय दक्षिण आफ्रिकेचा फलंदाजीचा कणा मोडला – ३९४ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतीय गोलंदाजांसमोर पूर्णपणे हतबल दिसला. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच यजमानांवर दबाव कायम ठेवला. दक्षिण आफ्रिकेकडून पॉल जेम्सने सर्वाधिक ४१ धावा आणि डॅनियल बोसमैनने ४० धावा केल्या, मात्र इतर फलंदाजांनी शरणागती पत्करली. अवघ्या ३५ षटकांत १६० धावांवर दक्षिण आफ्रिकेचा डाव आटोपला आणि भारताने मोठा विजय साजरा केला. हेही वाचा – Shikhar Dhawan Statement : ‘हे सहन केले जाऊ शकत नाही’; बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावर शिखर धवन संतप्त किशन सिंहची भेदक गोलंदाजी भारताच्या विजयात गोलंदाजांनी मोलाची भूमिका बजावली. विशेषतः किशन सिंहने घातक गोलंदाजी करत ४ षटकांत केवळ १५ धावा देऊन ३ बळी टिपले. त्याचबरोबर मोहम्मद एनां (२ बळी), तर हेनिल पटेल, कनिष्क चौहान, उद्धव मोहन, आरएस अंबरीश आणि स्वतः कर्णधार वैभव सूर्यवंशी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.